Saturday, September 14, 2019

आपल्या मुलांचा विवाहाला उशीर होत आहे का ? यावर एक उपाय ब्रह्मणस्पती सुक्त हवन १७ सप्टेंबर ला करावे.


उपवर मुलांचा विवाह लांबलेला असतो तेंव्हा पालक चिंतीत असतात. जेव्हा मुलाचे अगर मुलीचे वय ३० ओलांडून गेले की हि चिंता अजूनच वाढते. अश्यावेळी विवाह होण्यासाठी एखादा खात्रीचा उपाय सांगा असे उपवर मुलांचे पालक म्हणतात.

मी अश्या वय वाढत चाललेल्या आणि जन्मकुंडलीत सप्तमेश आणि शुक्र सुस्थितीत नसेल तर संकल्प करुन रुक्मिणी स्वयंवर याची ७ व्या अध्यायाचे संपुटयुक्त १८ पारायणे करायला सांगतो. अनेकदा मुली हे करायला तयार होतात. माझ्या अनुभवाने हा उपाय अत्यंत खात्रीचा आहे.

अनेकदा रुक्मिणी स्वयंवर चे पाठ करण्यासाठी उपवर मुलांना वेळ मिळत नाही. त्यासाठी मानसीक स्वस्थता नसते. रोज १४- १६ तास काम करावे लागत असेल तर उरलेल्या वेळात रोज अर्धा तास काढून रुक्मिणी स्वयंवराचे पाठ करणे शक्य होत नाही. अनेकदा उपवर मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेली असल्याने त्यांना मराठीमधील रुक्मिणीस्वयंवर सारखा ग्रंथ वाचणे कठीण होते. अश्या वेळी थोडा खर्चाचा पण एका दिवसात संपेल असा उपाय आहे का ? अशी विचारणा होते.

आपल्या ऋषी मुनींनी कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी जप, स्तोत्रपठण, ग्रंथवाचन असे उपाय सांगीतले आहेत तसेच विधीवत षोडशौपचारे पुजन आणि यज्ञ याबाबतीत सुध्दा तंत्र आणि मंत्रांची निर्मीती केलेली आहे. षोडश म्हणजे सोळा प्रकारे पुजन ज्यात प्रमुख देवतेच्या आवाहन आणि स्थापनेनंतर विवीध मंत्राने व जल आणि पंचामृताने  प्रमुख देवतेला अभिषेक केला जातो, मंगलद्र्व्याने पुजन केले जाते, विवीध पुष्प म्हणजे फ़ुले आणि पाने अर्पण केले जातात. धुप - दिव्याने आरती ओवाळली जाते याला षोडश उपचार असे म्हणतात. यांने मनाची एकाग्रता साधली जाते व त्यानंतर अग्नि प्रज्वलीत करुन विशीष्ठ मंत्रांच्या सह आहूती देऊन त्या त्या कार्यासाठी सहायभूत देवतेला आवाहन करुन प्रार्थना केल्यास कमी काळात त्याचे फ़ळ मिळते असे हे तंत्र आहे.



परंतु हे तंत्र स्वत: नीट शिकले नसेल तर पुरोहीत यांच्या सहायाने हे करावे लागते. काही विशीष्ठ यज्ञांना आधी पुजा आणि मग हवनाचे क्रम ठरविले आहेत या क्रमाने ते केल्यास फ़ळ मिळते.

ब्रह्मणस्पती सूक्ताने मंगळवारी येणार्या म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थीस हवन केल्यास विवाहाच्या मार्गातील अडथळे दुर होतात. कारण गणपती ही विघ्नहर्ता किंवा संकट हरण करणारी देवता आहे. उपवर मुलांचा विवाह जमत नाही हे त्यांच्या  सुखी संसाराच्या मार्गातील विघ्न किंवा संकट आहे. या विशीष्ठ हवनाने हे संकट दुर होते असा अनुभव आहे.

ह्या हवनाचे आधी महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं हे विधी झाल्यावर अग्निस्थापन करुन मुख्य हवनास प्रारंभ होतो. एकूण १३०२ आहूती देऊन, पुर्णाहूतीने हा यज्ञ संपन्न होतो ज्यात दुर्वांकूर, लाह्या, मोदक आणि साज्य समिमद्द्रव्यं अर्थात तुप असलेली समिधा  याचा उपयोग केला जातो. हा यज्ञ केल्याने श्रीगणपती ही देवता प्रसन्न होऊन त्याचे लवकर फ़ळ मिळणे अपेक्षीत आहे.

मला माहित असलेला ब्रह्मणस्पती सुक्ताने हवनाचा विधी मी वर दिला आहे. ह्याबाबत लिहीण्यास मी अधिकारी नाही. या क्षेत्रातील जाणते शास्त्री हवनाच्या पध्दती बद्द्ल आणि उत्कृष्ट पध्दतीबाबत बोलावे. वरील माहिती विस्ताराने सांगण्याचा हेतू या यज्ञाबाबत जास्त माहिती देणे आहे. पुरोहीतांनी याबाबत उपलब्ध ग्रंथ पहावा, शास्त्री महोदयांशी चर्चा करुन श्रेयस्कर काय ते ठरवावे.

यातील हवन सामग्री, लागणारा वेळ आणि तांत्रिक बाजू पहाता याला येणारा खर्च बराच आहे. ज्यांना हा प्रयोग करण्यासाठी खर्च करणे सहज शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करुन आपला अनुभव कळवावा. हा यज्ञ नदीकिनारी करावा. अशी जागा उपलब्ध नसेल तर श्रेष्ठ जागा शोधावी तसेच या कार्यासाठी जाणत्या पुरोहीतांशी संपर्क करावा.

येत्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी संकष्टी अंगारक योग येत असून ज्यांना विवाहाला विलंब होत आहे अश्यांनी आपल्या कुलपुरॊहीतांशी संपर्क करुन यज्ञा करता श्रेष्ठ जागा निवडून हे करावे व अनुभव कळवावा. पितृपक्ष आहे मग हे करावे की नको असा विचार मनात न आणता हे हवन करा. सकाळी उपवर मुलाचे आई-वडील हयात नसतील आणि त्यांची चतुर्थी ही तिथी असेल प्रथम श्राध्द करा. श्राध्दाचा लोप कधी करायचा नसतो.

आपल्या ऋषी मुनींनी सांगीतलेले प्रयोग करुन पहावेत जेणे करुन हे उपाय जास्त जास्त प्रचलीत होतील हे सांगणे हा या पोस्ट चा उद्देश आहे.

ज्यांना हा विधी कसा करायचा हे माहित नाही अश्या याज्ञीकांच्या साठी हा इंटरनेट वर उपलब्ध असलेला यज्ञविधी देत आहे. मी स्वत: याज्ञीक नसल्याने यावर अधिक मार्गदर्शन करु शकणार नाही अश्यावेळी याज्ञीकांनी आपल्या गुरुजनांशी चर्चा करुन हवन सामाग्री ठरवावी.

ब्रह्मणस्पती सुक्ताचे एकूण  श्लोक ६४  आहेत. ही सुक्ते संपुर्ण न देता फ़क्त सुरवात दिलेली आहे.


तत्र महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं, तथाचार्यादिऋत्विग्वरणं करिप्ये । आचार्यादीन्‌यथाविधि वृणुयात्‌। वृत: आचार्य: स्थण्डिलपूर्वभागे गणपतिभद्रे वा सर्वतोभद्रे वा केवले स्वस्तिके बह्मादिमण्डलदेवता: संस्थाप्य पूजयेत्‌। तदुपरि धान्यपूरितमध्यभागे कलशं संस्थाप्य तस्योपरि पूर्णपात्रं निधाय यथाशक्ति निर्मितां सुवर्णमर्यी यथोक्तलक्षणां श्रीगणेशप्रतिमां संस्थापर्यत्‌। सा प्रतिमा पूर्णपात्रोपरि लिखिते अष्टदले गणानां त्वाइति मन्त्रेण संस्थाप्या । अनन्तरं यथामिलितषोडशोपचारै: यथाविधि पूजां कुर्यात्‌ । पंचखाद्यं वा मोदकान्‌नैवेद्ये समर्पणं कृत्वा यथाशक्ति रत्नालङ्कारै: पूजयेत्‌। ततश्च स्थण्डिलान्तिके संस्कारपूर्वकं स्वगृह्योक्तविधिना अग्निं प्रतिष्ठाप्य स्थापितदेवताया: उत्तरभागे आदित्यादिनवग्रहादीनां आवाहयेत्संपूजयेच्च । ततश्चान्वाधानं कुर्यात्‌। तत्र च संकल्प: । मया क्रियमाणे ग्रहमखपूर्वकब्रह्मणस्पतिसुक्तहवनकर्मणि देवतापरिग्रहार्थमन्वाधानं करिष्ये । ततश्च अन्वाहिताग्नौ प्रधानदेवतां गणपर्ति द्विषष्टि-क्रमात्मकब्रह्मणस्पतिसूक्तेन प्रत्यर्चं जुहुुयात्‌। यथा काम: तथा द्रव्यमिति न्यायेन द्‌र्घाङ्कुरद्रव्यम्‌, मोदकद्रव्यम्‌, लाजाद्रव्यम्‌, साज्यसमिमद्‌द्रव्यं च गृह्णीयात्‌। एते मन्त्रा: हवनकाले ॐ कारयुक्ता: स्वाहान्ताश्च वक्तव्या: ।

(१) ॐ सोमानं स्वरणं. औशिज: स्वाहा ।
(२) ॐ यो रीवान्यो. तुर: स्वाहा ।
(३) ॐ मा न: शंसो. ब्रह्मणस्पते स्वाहा ।
(४) ॐ स घा वीरो. मर्त्यं स्वाहा ।
(५) ॐ त्वं तं ब्रह्मण. त्वंहस: स्वाहा ।
(६) ॐ उत्तिष्ठ. भवासचा स्वाहा ।
(७) ॐ त्यामिद्धि. आचके स्वाहा ।
(८) ॐ प्रैतु ब्रह्मण. नयंतु न: स्वाहा ।
(९) ॐ यो वाघते. मनेहसं स्वाहा ।
(१०) ॐ प्रनूनं. चक्रिरे स्वाहा ।
(११) ॐ तमिद्वोचे. अश्नवत्स्वाहा ।
(१२) ॐ को देव. क्षयं दघे स्वाहा ।
(१३) ॐ उप क्षत्रं. वज्रिण: स्वाहा ।
(१४) ॐ गणानां त्वा. सादनं स्वाहा ।
(१५) ॐ देवाश्चित्ते. ब्रह्मणामसि स्वाहा ।
(१६) ॐ आ विबाध्या. स्वर्विदं स्वाहा ।
(१७) ॐ सुनीति. महित्वनं स्वाहा ।
(१८) ॐ न तमंहो. ब्रह्मणस्पते स्वाहा ।
(१९) ॐ त्वं नो. हरस्वती स्वाहा ।
(२०) ॐ उत वा यो. कृधि स्वाहा ।
(२१) ॐ त्रातारं. मुन्नशन्‌स्वाहा ।
(२२) ॐ त्वया वयं. अनप्नस: स्वाहा ।
(२३) ॐ त्वया व यमु. तारिषी महि स्वाहा ।
(२४) ॐ अनानुदो. हर्षिण: स्वाहा ।
(२५) ॐ अदेवे. शर्धत: स्वाहा ।
(२६) ॐ भरेषु. रथाँ इव स्वाहा ।
(२७) ॐ तेजिष्ठया. अर्दय स्वाहा ।
(२८) ॐ बृहस्पते. धेहि चित्रं स्वाहा ।
(२९) ॐ मा. न:. साम्नोविदु: स्वाहा ।
(३०) ॐ विश्वेभ्यो. धर्मरि स्वाहा ।
(३१) ॐ तव श्रिये. अर्णवं स्वाहा ।
(३२) ॐ ब्रह्मणस्पते. सुवीरा: स्वाहा ।
(३३) ॐ सेमा. नो मर्ति स्वाहा ।
(३४) ॐ यो नं त्वा. पर्वतं स्वाहा ।
(३५) ॐ तद्देवानां. व्यचक्षय स्वाहा ।
(३६) ॐ अश्मास्य. समुद्रिणं स्वाहा ।
(३७) ॐ सना ता. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(३८) ॐ अमिनक्ष. युरा विशं स्वाहा ।
(३९) ॐ ऋतावान:. जहुर्हि तं स्वाहा ।
(४०) ॐ ऋतज्येन. कर्णयोनय: स्वाहा ।
(४१) ॐ स संनय. वृथा स्वाहा ।
(४२) ॐ विभु प्रभु. विश: स्वाहा ।
(४३) ॐ जोऽवरे. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(४४) ॐ विश्वं सत्यं. जिगातं स्वाहा ।
(४५) ॐ उताशिष्ठा. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(४६) ॐ ब्रह्मणस्पते पृथक्‌स्वाहा ।
(४७) ॐ ब्रह्मणस्पते. वेषे मे हवं स्वाहा ।
(४८) ॐ ब्रह्मणस्पते त्वम. सुवीरा: स्वाहा ।
(४९) ॐ इन्धानो. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(५०) ॐ वीरेभि. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(५१) ॐ सिन्हु. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(५२) ॐ तस्मा. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(५३) ॐ तस्मा इ. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।
(५४) ॐ ऋजुरि. भोजनं स्वाहा ।
(५५) ॐ यजस्व. वृणीमहे स्वाहा ।
(५६) ॐ स इज्ज. ब्रह्मणस्पर्ति स्वाहा ।
(५७) ॐ योऽअस्मै. रद्‌भुत: स्वाहा ।
(५८) ॐ तमु ज्येष्ठं. राजा स्वाहा ।
(५९) ॐ इयं वा. मराती: स्वाहा ।
(६०) ॐ चत्तो इत. द्दषन्निहि स्वाहा ।
(६१) ॐ अदो य. परस्तरं स्वाहा ।
(६२) ॐ अग्निर्येन. समिदं कुरु स्वाहा ।
(६३) ॐ यत्र बाणा:. शर्म यच्छतु स्वाहा ।
(६४) ॐ यदिन्द्र ब्रह्मणस्पते. पात्वंहस: स्वाहा ।

एवं ब्रह्मणस्पतिसूक्तमन्त्राणां हवनं कृत्वा १३०२ आहुतिभि: ब्रह्मादिमण्डलदेवता: प्रत्येकं तिलैर्वा घृतेन-एकैकयाहुत्यादशदश वा यष्टव्या: ।
(द्रव्यका: दूर्वाङ्‌कुरद्रव्यम्‌कीर्तिकाम: लाजाद्रव्यम्‌, इष्टमनोरथार्थसिद्धयर्थं मोदकद्रव्यम्‌, गृह्लीयात्‌। शेषेण स्विपृकृत्‌। अन्वाधानोक्तरीत्या होमं संपाद्य पूर्णाहुतिं दत्वा संस्रवादि कृत्वा होमशेषं समापयेत्‌ । ततश्च प्रार्थयेत्‌। देहेन वाचामनसा कृतान्मे सांसर्गिकान्‌जागृतस्वप्नजातान्‌। सौषुप्ततौर्यान्‌सकलापराधान्‌क्षमस्व. हेरम्ब दयानिधे त्वम्‌॥१॥
ततश्चाभिषेक: । ततश्चाभिषेक: । आचार्य: सदारं यजमानमभिर्षिचेत्‌। तथा च रजामान: अग्निपूजनं कृत्वा विमूतिधारणं कुर्यात्‌।
कर्मण: साङ्गतासिद्धयर्थं यथाशक्ति गोप्रदानादिचदक्षिणां आचार्यादिभ्य: दत्वा ब्राह्मणभोजनसंकल्पं कुर्यात्‌। तथा च स्थापितदेवतादीनां विसर्जनं कृत्वा तत्सर्वं आचार्याय दत्व पीठदानादिकं कुर्यात्‌।
प्रतिमाविसर्जनमन्त्र: । गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने त्वं गणेश्वर ॥ कर्मणानेन मे नित्यं यथोक्तफलदो भव ॥ प्रतिमादानमन्त्रा: । गणेशप्रतिमां श्रेष्ठां वस्त्रयुग्मसंमन्विताम्‌॥ तुभ्यं संप्रददे विप्र प्रीयतां मे गजानन: ॥१॥
गणेश: प्रतिगृह्लाति गणेशो वे ददाति च ॥ गणेशस्तारको हात्र गणेशाय नमो नम: ॥२॥ विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत ॥ पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नं विनाशय ॥३॥ भूयसीदक्षिणादानं कृत्वा एतत्कर्म गणपतिप्रीत्यर्थं प्ररमेश्वरार्पणं कुर्यात्‌।
ब्राह्मणेभ्य: कर्मसम्पूर्णतां वाचयित्वा तेभ्य: आशिष: गृहीत्वा सर्वै: आचार्यादिभि: साकं भुञ्जीयात्‌। भोजनोत्तरं ताम्बूलदक्षिणां दत्वा आशिष: गृह्लीयात्‌। ॥ ब्रह्मणस्पतिसूक्तहोमविधि: सुसंपुर्णं॥

Friday, September 13, 2019

विवाह लवकर व्हावा यासाठी उपाय


आपल्या उपवर मुलाचा किंवा मुलीचा वेळेवर विवाह व्हावा. त्यांना वैवाहीक सौख्य मिळावे. त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून पालक प्रयत्नशील असतात. अनेकदा उपवर मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार असताना विवाह जुळून येत नाही. अनेक ठिकाणी वधू-वर सुचक मंडळात नाव नोंदवून सुध्दा अपेक्षीत स्थळे येत नाहीत. आली तर मुलांना ती स्थळे पसंत नसतात. यासर्व मुळे उपवर मुला मुलींच्या विवाहाचे सरासरी वय वाढत आहे. अनेकदा पालक यामुळे चिंतेत पडतात.

दिवाळी २०१९ नंतर तुळशीच्या विवाहानंतर चातुर्मासामधे थांबलेले विवाह मुहूर्त पुन्हा सुरु होतात. मग पुन्हा आशा पल्लवीत होतात. पालक पुन्हा काही स्थळे पहाण्यासाठी उत्साहाने पुढे पाहू लागतात. परदेशात असलेली मुले नाताळाच्या सुट्टीत भारतात येतात आणि त्यांनाही आठ -दहा दिवसात अनेक स्थळे पाहून निर्णय घ्यायचा असतो.

आपल्या उपवर मुलांचा विवाह लवकर जमावा म्ह्णून  ज्योतिषी म्हणून मी उपाय सांगतो त्यातले अत्यंत साधे वे सोपे उपाय जे सहज करता येतात. हे उपाय साधे आणि सोपे असले तरी अनुभव सिध्द आहेत. मी अनेकदा याची प्रचिती घेतलेली आहे.

१) कुलदैवताची पुजा : दर वर्षी वर्षातून एकदा कुलदैवताचे दर्शन घेण्याचा रिवाज सर्वत्र आहे. कुलदैवत याचा कुलस्वामिनी आणि कुलदैवत किंवा कुलदेवता दोन्हीही. अनेकदा कुलस्वामिनी किंवा कुलदेवता वेगळ्या नसतात. एकाच कुलदैवताची वार्षीक पुजा केली जाते. ही पुजा कशी करायची याबाबत कोणताही बदल करायचा नाही. आपल्या परंपरेने ही पुजा सुरु ठेवायची. आपली प्रतिवार्षीक पुजा झाल्यावर आपल्या कुलदैवताच्या समोर एक जास्तीचा नारळ ठेऊन आपल्या उपवर मुलीचा किंवा मुलाचा विवाह वर्षभरात व्हावा अशी प्रार्थना मुलाच्या आई व वडीलांनी करायची. असे झाल्यास विवाह झाल्यावर वधू- वरांना दर्शनाला घेऊन येऊ इतकेच बोलायचे.

कुलदैवते महाराष्ट्रात कुलानुसार वेगवेगळी आहेत. जसे जेजूरीचा /पालीचा खंडोबा, कोल्हापुरची अंबाबाई, तुळजापुरची तुळजाभवानी, व्याडेश्वर, अंबेजोगाई इत्यादी. यांच्या वार्षीक पुजनाच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत.

कुलदैवत पुजनाच्या वेळी उपवर मुलाचे आई- वडील सोबत उपवर मुलगा किंवा मुलगी कुलदैवताच्या दर्शनाला हजर असले पाहीजे. दुर्दैवाने आई- वडील पैकी एक जर हयात नसेल, आजारी असल्यामुळे येऊ शकत नसेल किंवा अन्य कारण असेल तरी माहीत असलेल्या कुलदैवताच्या दर्शनाला आई-वडील यांच्या पैकी कुणीही एक,  उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या सोबत जाऊन, वार्षिक पुजा करून , जास्तीचा नारळ ठेऊन प्रार्थना करू शकतात.

दुदैवाने उपवर मुलाचे किंवा मुलीचे आई- वडील हयात नसतील तर काका - काकू किंवा आजोबा- आजी ( वडीलांचे वडील- आई प्रवास करु शकत असतील तर) हा उपाय करु शकतात.

अनेकदा हा उपाय केल्यावर महिनाभरात विवाह ठरल्याचे मी स्वत: पाहिले आहे.

आई- वडील अनेक वर्षात गेलेले नसतील तर या निमीत्ताने जावे. मनोभावे वार्षीक पुजेत खंड पडल्याबद्दल क्षमायाचना करुन वार्षीक पुजेपेक्षा जास्तीची पुजा आपल्या क्षेत्रोपाध्यांना विचारुन यथासांग करावी. यानंतर कुलदैवताच्या पुजनात खंड न येता दर वर्षी पुजन करावे. विवाह घडून आल्यावर मात्र सुन-मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरु नये.

उपवर मुलांच्या जन्मकुंडलीमधे दोष नसताना, योग नसताना सुध्दा विवाहाचा योग येतो असे कुलदैवताच्या पुजनाचे फ़ळ आहे.

२) श्रीकृष्ण पुजन : आपले कुलदैवत दर्शन नुकतेच झालेले आहे किंवा नजीकच्या काळात उपवर मुलाच्या- मुलीच्या समवेत घेणे शक्य नसेल तर श्रीकृष्ण पुजन हा उपाय उपवर मुलाने किंवा मुलीने करायचा आहे. त्यांच्या ऐवजी दुसर्या कोणी करु नये. उपाय अगदी सोपा आहे. उपवर मुलाने किंवा मुलीने दर बुधवारी घरातल्या बाळकृष्णाच्या देवपुजेच्या मुर्तीला तुळस वाहून विवाह लवकर व्हावा अशी प्रार्थना करावी. साधारण पणे २१ बुधवार पर्यंत हा उपाय सुरू ठेवावा. या कालावधीत विवाह ठरला तर मात्र विवाह होई पर्यंत हा उपाय सुरू ठेवावा.

उपवर मुलगा किंवा मुलगी जर नोकरी - व्यवसायाच्या निमीत्ताने परगावी असतील तर तिथे एखादा श्रीकृष्णाचा फ़ोटो ठेऊन हा उपाय करता येईल. अनेकदा या साध्या उपायाने विवाह घडून येतो. उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमविवाहातले अडथळे दुर होतात.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहात अनेक अडथळे आले होते. यावर संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहीला असून त्याचे विधीवत संपुट युक्त पारायण केल्याने कठीण योग असलेला विवाह जुळून येतो. आपल्या उपवर मुलाच्या- मुलीच्या जन्मकुंडलीत विवाहाचे कठीण योग असताना हा उपाय करतात परंतु कठीण योग नसताना मात्र वरील साध्या उपायाने विवाह जुळून येतो.

३) जन्मनक्षत्र शांती :  अनेकदा शास्त्रात दिल्याप्रमाणे जननशांतीची आवश्यकता असताना जननशांती झालेली नसेल तर विवाह जमून येण्यास अडथळे येतात. मघा १ ले चरण, आश्लेषा, जेष्ठा, मुळ किंवा पुर्वाषाढा ३ रे चरण, वैधृती किंवा व्यतीपात योगावरचा जन्म तसेच विष्टी करणावरचा  यावर जन्म असता जननशांती प्रयोग आवश्यक असतो. ती केलेली नसेल तर त्वरीत करावी. यासाठी भुमीवर अग्नी असलेला दिवस निवडावा. असे केल्याने त्वरीत विवाह जमतो असा अनुभव आहे.

जर, जेंव्हा गोप्रसव जननशांती सांगीतलेली आहे आणि जननशांती झालेली आहे तरीही विवाह होत नाही अश्यावेळी जननशांती प्रयोगात काही त्रुटी आहेत असे जाणावे. याला उपाय जन्मनक्षत्राच्या दिवशी बांधलेल्या गावरान गाईला ( जर्सी नाही ) योग्य ती सुरक्षीतता बाळगून गुळ व गहू उपवर मुलाने किंवा मुलीने आपल्या तळहातावर घेऊन खायला द्यावेत. हे होताना गायीच्या जीभेचा स्पर्श तळहाताला झाल्याची खात्री होई पर्यंत २-३ वेळा ही कृती करावी. अनेकदा पुरॊहीत जननशांती करताना प्रत्यक्ष गाय न आणता चांदीच्या गाय ठेऊन हा प्रयोग करतात. याने अपेक्षित फ़ळ मिळत नाही म्हणून हा उपाय करावा.

हा उपाय मुळ जननशांतीला पर्यायी नाही. त्यातील त्रुटी निवारणाचा आहे असे लक्षात ठेवावे.


४) पितर दोष निवारण ( अ)  : देवघरात अनेकदा मृत माता/पिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्यांचे फ़ोटॊ देवघरात ठेवले जातात. ही जागा यासाठी योग्य नाही. याने देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळत नाही. असे टाक शास्त्रानुसार विसर्जन करावेत. फ़ोटो शक्यतो असूच नयेत पण तशी भावना असल्यास देवघरापासून दुर वेगळ्य़ा खोलीत स्थापन करावेत. घरातल्या देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळाल्याने सुध्दा विवाहातले अडथळे दुर होतात.

( ब) अनेकदा आमचा विश्वास नाही असे सांगून श्राध्द /पक्ष टाळले जातात. अनेक ज्योतिषांनी सांगीतलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेत दोष नाही असे सांगत असतील व उपवर मुला मुलीचे आई वडील श्राध्दाचे अधिकारी असता श्राध्द टळले असेल तर सुरवातीस त्रिपींडी श्राध्द करावे. यानंतर विवाह होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राध्द/पक्ष यांचा लोप करु नये. श्राध्द/पक्ष लोप पावल्याने कुटुंबास पितरांचे शुभ आशिर्वाद मिळण्यास अडथळा निर्माण होतो.

५ ) नुकत्याच विवाह झालेल्या वधू-वरांचे आशिर्वाद : उपवर मुलाच्या/मुलीच्या मित्राचे/ मैत्रीणीचे भावंडाचे विवाह संपन्न होताच ( मंगलाष्टके संपुन वधू- वर एकमेकांस हार घातल्यावर ) उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यास नववधू/ वरास आधीच सांगून ठेवावे. यामुळे पुढील विवाह विधी लांबू नयेत यासाठी उपवर मुलीने /मुलाने विवाह वेदीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पहावा. आपल्या मित्रास/ मैत्रीणीस/ जवळच्या भावंडास ( ज्यांचे लग्न नुकतेच लागले आहे ) डोक्यावर हात ठेऊन माझ्या सारखा विवाह यामुलाचा/मुलीचा त्वरीत व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला सांगावे.

उत्तर भारतात हा उपाय प्रसिध्द आहे. जन्मकुंडली मधे विवाह होण्यासाठी दोष नसताना हा साधा उपाय सुध्दा जोरदार आहे.

सर्वसाधारण पणे वरील पाच उपाय हे उपवर मुलांच्या जन्मकुंडलीत विवाह होण्यासाठी विलंब म्हणजे मंगळ दोष किंवा शनि दोष नसताना, सप्तमेष व शुक्र बलवान असताना उपवर मुलाचे वय २१ ते २७ या वयातच अनुभवास येतात.

जर मंगळ दोष किंवा शनि दोष असताना विवाहाला विलंब होतो. या पेक्षा ही काही कठीण विवाह योग असतात त्यावरचे उपाय वेगळे असतात. जन्मकुंडली पाहून, उपवर मुलाशी- मुलीशी बोलून त्यांची मानसीकता समजून काही तांत्रिक उपायाने यावर मार्ग निघतो.