Saturday, August 7, 2021

दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.

 दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.


याची कृपया माहिती घ्यावी. 


विवाह संदर्भात बरीच माहिती विचारली जाते. यासाठी हे तीन प्रश्न गृहीत धरले जातील.


1) विवाह संदर्भातील प्रश्न फ़ी रुपये 300/- असेल परंतु रुपये 300/- फ़ी मधे इतर प्रश्न विचारता येणार नाहीत.

   विवाह संदर्भातील प्रश्न विचारल्यावर याच फ़ी मधे करीयर किंवा अन्य प्रश्न विचारु नये.


2) विवाहा शिवाय अन्य विषयावर तीन प्रश्न विचारण्यासाठी फ़ी रुपये 300/- आहे


3) गुणमेलन साठी फ़ी पुर्वी प्रमाणे रुपये 300/- एका गुणमेलनासाठी आहे. गुणमेलना मधे वधू वराचे करीयरच्या

   किंवा आर्थिक परिस्थिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत. हा स्वतंत्र विषय आहे.


4) वधू वरांना लाभणार्या मुहूर्ताची फ़ी रुपये 500/- आहे. यात तुम्हाला हव्या त्या महिन्यातले पाच मुहूर्त मिळतील.

    या संदर्भातील विवाहाचे अपेक्षीत महिने व विवाह स्थळ ( शहर ) तसेच मुहूर्त सकाळचा , दुपारचा किंवा 

    संध्याकाळचा या बाबतीत माहिती फ़ि सोबत पाठवणे तसेच वधू वरांच्या जन्म तारीख, जन्मवेळ इ पाठवा.


5) संतती संदर्भातील प्रश्नांच्या साठी फ़ी रुपये 600/  आहे.

या साठी पती व पत्नी यांची नाव,जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ हवे. संतती विषयावर् असलेला सल्ला हा महागड्या डॉक्टर उपायांना पर्याय नाही. सुरु असलेल्या ट्रीटमेंटला यश मिळत नसेल तर या उपायाने यश मिळेल.


6) प्रत्यक्ष ऑफ़ीसवर अपॉइंटमेट किंवा व्हिडीओ अपॉइंटमेट साठी फ़ी रुपये 1 तासा साठी रुपये 1000 आहे.


अत्यंत महत्वाचे 


1) फ़ी पाठवताना मी उपलब्ध आहे याची खात्री करावी. अनेकदा घरगुती कामासाठी काम बंद असते. अश्यावेळी फ़ी मिळूनही मार्गदर्शन उशीरा मिळेल अशी शक्यता निर्माण होते.


2) फ़ी शक्यतो सकाळी पाठवावी. मार्गदर्शनाचा दर्जा खरा्ब होऊ नये म्हणुन मी खुप उशीरा मार्गदर्शन करत नाही. घाई करु नये.


3) जन्मकुंडली चे फ़ोटॊ कृपया पाठवू नयेत. त्या ऐवजी जन्मतारीख, जन्मवेळ ( सकाळी, दुपारी संघ्याकाळी किंवा रात्री याचा स्पष्ट उल्लेख करावा.  जन्मस्थानाचा तालुका व जिल्हा लिहावा.

4) एकाच जन्मकुंडली वर विवाह किंवा इतर विषयावर तीन प्रश्नांचे साठी फ़ी रुपये 300 आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा 1 प्रश्न असे पाठवू नये.





Monday, January 25, 2021

माननीय डॉ जयंत नारळीकरांना पत्र

 माननीय डॉ जयंत नारळीकर सर, तुमच्या बदललेल्या दृष्टिकोन चांगला आहे. पण तुम्ही फक्त समाज विज्ञान वादी नाही असे मानत आहात.



दुसरी बाजु सर्व ज्योतिषी फक्त andriod application नाही तर ज्योतिषशास्र विषयक सॉफ़्ट्वेअरचा वापर करून कमीत कमी वेळात अचुक जन्मकुंडली तयार करून भविष्य कथनामधे अचुकते कडै जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा ज्योतिषी लोकांचा प्रचलित विज्ञानाचा वापर करण्याचा दृष्टिकोन तुम्हाला उल्लेखनीय का वाटत नाही याबद्दल बोललात तर आनंद होईल.

बाकी संधी मिळताच आपण आपला जुना दृष्टिकोन उगाळून ज्योतिष हे शास्त्र नाही म्हणला नाहीत हे फार बरे झाले.

तसेही तुमच्या सारख्या मान्यवर पण मुठभर विज्ञान वादी आणि स्वतः ला बुध्दी नसलेले अनेक तथाकथित बुध्दीवादी यांच्या मताला कुणी फारसे विचारत नाही हे आता जाणवले असेल.

मधल्या काळात नागपुरच्या कालीदास विद्यापिठाने ज्योतिषशास्र विषयावर अभ्यासक्रम तयार करून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. यात विद्यार्थी येत आहेत आणि शिकत आहेत.

महाराष्ट्र ज्योतिष परिषद ही संस्था गेले अनेक वर्षे विद्यापीठाच्या तोडीचे काम महाराष्ट्रात ज्योतिषशास्त्री परिक्षा घेऊन करत आहे.

या सोबत जोडलेल्या बातमी प्रमाणे समाज ज्योतिष सल्ला घेणार कारण मानवी बुध्दीला अगम्य असलेल्या कर्माच्या सिध्दांताचा मागोवा घेत जन्मकुंडली माध्यमातुन ज्या विषयावर मॉडर्न सायन्स जीवनातल्या अनिश्चित गोष्टीबाबत मार्गदर्शन करू शकणार नाही तिथे ज्योतिषशास्र नक्कीच मानवाला दिलासा देते.

याची खात्री समाजाला आहे म्हणुनच ते आपला वेळ व पैसा खर्च करून ज्योतिष विषयावर सल्ला घेतात.

तुम्ही लिहले असतील त्या पेक्षा संख्येने जास्त ग्रंथ माननीय व.दा. भट सरांनी लिहले आहेत आणि त्याच्या अनेक आवृत्ती उपयुक्ततेची साक्ष देत आहेत.

माननीय भट सर बीएस सी आहेत ही बाब विसरून चालणार नाही.

तुम्ही लिहलेल्या विज्ञान कथा या साहित्य प्रकार मानला तर माननीय व.दा. भट सरांना पुस्तकांची संख्या व आवृत्त्या पहाता, या आधीच हा मान मिळायला हवा होता.

इथेच हा प्रकार संपत नाही. घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून अंधाश्रध्दा विषयावर बोलणारे काही महाभाग पंचांग जाळू अश्या धमक्या काही वर्षांपुर्वी देत होते.

इथे विज्ञान सोडा, समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्र यांचा अभ्यास नसलेले मराठी तथाकथित विद्वान एकेकाळी प्रबोधन करत होते. ही त्या काळातली शोकांतीकाच म्हणावी लागेल.

असो, असे काळे कोळसे अनेक आहेत. त्यांना समाज कृतीने उत्तर देत आहे.

आपली निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी झाली यात आनंद आहे. पण तुम्ही पहिल्याच वक्तव्यात जे केले म्हणुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवत मला व्यक्त होणे आवश्यकच आहे.

ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर
चिंचवड पुणे 


Like
Comment
Share