Tuesday, December 20, 2016

साडेसाती वृश्चिक - धनु आणि मकर राशीची



२६ जानेवारी २०१७ रोजी शनिमहाराज धनु राशीत प्रवेश करणार आहेत. तूळा राशीची साडेसाती २६ जानेवारीला संपली तरी १०० टक्के संपत नाही. वृश्चिक राशीला शेवटची अडीचकी सुरु होते. धनु राशीला मधली अडिचकी सुरु होते आणि मकर राशीला साडेसातीची सुरवात होत आहे. प्रत्येक राशीला काय आणि कशी फ़ळे मिळणार आहेत याबाबत आता पाहू.

तूळा रास

या प्रवेशासोबत तूळ राशीची साडेसाती २६ जानेवारी २०१६ ते २० जून २०१७ या साधारण सहा महिने कालावधीसाठी संपणार आहे. हत्ती गेला आणि शेपुट राहीले असा अनुभव तुम्हाला येणार आहे. कारण २० जुन २०१७ पासुन २६ अक्टोबर २०१७ कालावधीसाठी साडेसाती पुन्हा येईल. त्याचा परिणाम खास करुन तूळा राशीच्या शेवटच्या अंशात म्हणजे विशाखा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना थोडासा प्रभावीत करेल. त्यांनी अजिबात चिंता करण्याचे कारण नाही.

फ़क्त तूळ रास व ज्यांचे वृषभ लग्नाच्या लोकांना या साडेसातीचा  त्रास संपला असे वाटणार नाही कारण  धनु राशीतला शनि, लग्न राशीकडुन अष्टमात जात आहे. वृषभ राशीला शनि राजयोग कारक आहे. तो नवमेश- द्शमेश आहे. नोकरी- व्यवसायात पुढील अडीच वर्षात  यश हुकुमी मिळणार नाही. यशासाठी झगडावे लागेल. उत्तम ज्योतिषाला विचारा की लग्न राशीकडुन तुमचा गुरु कोणत्या स्थानात आहे. तो जर उत्तम स्थानी असेल तर चिंता करण्याचे कारण नाही.

साडेसाती संपताना काही न्युनगंड तयार होतात. कोणाला ड्रायव्हिंगची भिती तयार होते, कोणाला काही परिस्थीतीचा सामना करण्याचे धैर्य रहात नाही तर कोणाला काही नाते- संबंध म्हणजे नुसता त्रास असे वाटायला लागते. आपण अजिबात कोणती उपासना करत नसाल तर अंघोळीनंतर गायत्री मंत्राचा मनापासुन जप करा. या त्रासातुन मोकळे व्हाल. याच बरोबर आपल्या बॅक ऑफ़ द माइंड मध्ये असे कोणते न्युनगंड तयार झाले आहेत आणि ते का आहेत याची कारणे शोधा. समजा, तुम्हाला साडेसातीत एखादा अपघात झाला म्हणुन तुम्ही ड्रायव्हींग करायला भीत असाल तर मनाला बजावा की असे पुन्हा पुन्हा घडत नाही. ज्याची भिती वाटते ते हमखास करा. त्याच बरोबर आपली उपासना सुरु ठेवा.

वृश्चिक रास 

आपली साडेसाती संपायला अजुन सर्वसाधारण अडिच वर्षे बाकी आहेत. मागची अडिच वर्षे तुम्ही खुपच पोळले गेले आहात. तुमच्या चंद्रावरुन म्हणजे मनाचे नियंत्रण करणारा ग्रह यावरुन मागिल अडिच वर्षे शनिचे भ्रमण झाले आहे. मनाला खुपच त्रास झाला असेल. ज्यांचा जन्म १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर काळात आहे अश्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती जरा जास्तच त्रासल्या असतील. आजारपण, मानहानी आणि वडीलांना त्रास असे प्रकार मागील अडीच वर्षात दिसले असतील. आपला रवि जर चंद्रा बरोबर वृश्चिकेत असेल तर शक्यता आहे की बुध आणि शुक्र या पैकी एखादा ग्रह किंवा दोन्हीही ग्रह वृश्चिक राशीत असतील.  अश्यावेळी ही दाहकता फ़ारच जाणवली असेल. ह्या काळात आपल्याकडुन नीट निर्णय घेतले गेले नसतील. डायबेटीस असेल तर रक्तातली साखर वाढली असेल आणि आपल्या कुटुंबातील स्त्रीवर्गाला सुध्दा काहीना काही सहन करावे लागले असेल. पण तो खराब काळ आता संपला आहे.

आपल्याला न्युनगंड निर्माण झाले तरी त्यावर कशी मात करायची याचे चांगले तंत्र अवगत आहे. आपण खुपच पोळले असाल तरी आता मानसीक रित्या बाहेर याल.

चंद्र राशीकडुन धनु रास तुमच्या कुटुंब स्थानात येते. जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळातला असेल तर या काळात शनिचे भ्रमण तुमच्या रवि वरुन होणार आहे. याचा परिणाम म्हणुन आपल्याला मानहानी स्विकारावी लागु शकते. आरोग्याच्या तक्रारी दिसु शकतात उदा. अर्थ तंबाखु खात असाल तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुक रहा. दात दुखत आहे म्हणुन घरगुती उपाय करु नका. किमान एक रात्र आपली झोप जाईल. दात दुखतो आहे आणि उद्या रविवार आहे अश्यावेळी डेंटिस्ट ना भेट द्या. कितीही गर्दी असली तरी उपचार करुन घ्या. साडेसातीमधे शिळे अन्न खाऊ नका. राहूची महादशा चालु असेल तर शपथ घ्या की शिळे खाणार नाही. हे महिलांच्या बाबतीत जास्त लागु होते. कारण फ़ेकुन कसे द्यायचे म्हणुन महिला ते अन्न खातात.

जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी आपले सरकारी स्कीम मधले धन धोक्यात येऊ शकते. आपण पीपीएफ़ मधे पैसे ठेवले असतील आणि १५ वर्षे उलटुन गेली असतील तर मुदत वाढीचा एक अर्ज द्यावा लागतो तो नक्की द्या. तसेच या निमीत्ताने आपण पीपीएफ़ साठी नॉमीनेशन केले आहे ना ते पहा. घाबरु नका, माझ्या या वाक्याचा चुकुनही गैर अर्थ घेऊ नका. तुमच्या जीवाला धोका आहे असे अजिबात नाही. मी कोण्या व्यक्तीचा मृत्यु वर्तवणे सोडाच हींट सुध्दा देत नाही. व्यक्ती उगाचच घाबरुन जाते. त्यामुळे सर्वच वृश्चिक राशीच्या मंडळीनी याच अर्थ समजाऊन घ्या. एकतर त्या पीपीएफ़ अकाऊंटस  सरकारी बॅकेचे कर्मचारी फ़ारसे उत्साहाने किंवा काळजीने हाताळत नाहीत. पोस्ट खात्याबाबत फ़ारसे न बोललेले बरे म्हणुन मला हे सर्व लिहावेसे वाटले.

तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी याकाळातला असुन धनु राशीत जर रवि बरोबर बुध, शुक्र हे ग्रह असतील तर काय घडेल हे जाणण्यासाठी एखाद्या जाणत्या ज्योतिषाला भेटा. तसेच मीन, मिथुन, कन्या या ही राशीत अनेक ग्रह असतील तरीही पत्रिका दाखवा. काही छोटे त्रास शनिच्या भ्रमणाने संभवतात. त्याबाबत जाणुन घ्या.

या  शिवाय विवीध लग्न राशींना चंद्राची रास वृश्चिक असताना काय फ़ळे मिळतील ते पाहु

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेची चिंता करावी लागेल.
तूळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत  काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. हे खर्च चांगल्या कामासाठी झाले तर ठीकच आहे.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुमचा फ़ार विश्वास नाही या सगळ्यावर पण त्रास झाल्यानंतर काही करण्याऐवजी उपासना करत नसाल तर करा इतकेच लिहेन. तुमच्या लहान मुलांची वृश्चिक राशी - जेष्ठा नक्षत्र आहे पण अजुनही जननशांती केली नसेल तर करा. तुमचे जेष्ठा नक्षत्र आणि मुलाचे किंवा मुलीचेही जेष्ठा नक्षत्र असेल तर हा मोठा दोष आहे. त्याला होणारा त्रास तुम्हाला भोगता येत नाही. आई- वडील म्हणुन तुम्ही इतकेच करु शकता त्यांची जननशांती करा.

धनु राशी :

तुम्हाला जितकी उत्सुकता आहे की साडेसातीची मधली अडीचकी कशी जाईल तितकीच मलाही आहे. मला १९८६ साल ते १९८८ सालात मागच्या साडेसातीत मधली अडीचकी होती. ५ मे १९८६ साली एक छोटा अपघात प्रयाग हॉस्पीटल-  समोर पुणे येथे मला झाला होता. पुढच्या पाच मिनीटात मी जखमेवर उपचार ही केले होते पण ही जखम मला तीन महिने पुरली. शेवटी माझे सदगुरु श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या कृपेने चमत्कार होऊन जखम बरी झाली. १९८७ सालच्या मार्च महिन्यात माझे लग्न होते पण मी जोरदार आजारी पडलो. तीन दिवस कोणतेही निदान नाही. पुन्हा सदगुरु धाऊन आले. मग निदान झाले की फ़क्त अ‍ॅसिडीटी झाली आहे. मग लग्नही आनंदाने पार पडले. त्या पाठोपाठ एक नको असताना ऑपरेशन झाले केवळ चुकीच्या निदानामुळे. अजुनही मानहानी होईल अशी घटना घडली. नोकरीत खुप त्रास झाला.  माझ्या मते माझे मुळ नक्षत्र असुन जननशांती न झाल्याने तसेच अमावस्येचा जन्म तीही शांती न झाल्याने हे सर्व घडले. पुढे मी वयाच्या ३० वर्षांनंतर स्व हस्ते या शांती केल्या. कारण मला आता ज्योतिष समजु लागले होते. मी साधना करत नव्हतो ती करायला लागलो. आता त्रास होणार आहेच पण तो इतका जोरदार नसेल.

तुमची धनु रास आहे आणि मुळ नक्षत्र असेल तर जननशांती केली नसेल तर करा. जर धनु रास असुन जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळात असेल तर जन्मकाळी अमावस्या असण्याची शक्यता आहे. मग जननशांती कराच आणि जर जाणत्या वयात ही दुसरी साडेसाती येणार असेल तर अनुभव घ्या आणि फ़रक जाणवेल. जननशांती दुसरी साडेसातीत चंद्रावरुन शनी जाण्याआधी केलीत तर ही साडेसाती सुसह्य होईल.

सर्व धनु राशीच्या लोकांना चंद्रावरुन शनिचे भ्रमण झाल्याचे  परिणाम ह्या काळात दिसतील. किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप होणार आहे. हमखास एखादी व्यक्ती असे वागेल की तुम्हाला अपेक्षा नसेल आणि म्हणुन मानसीक त्रास होईल. मुळ नक्षत्रांच्या लोकांना हे जरा जास्त जाणवेल पण पुर्वाषाढा आणि उत्तराषाढा यांना तितका त्रास होणार नाही. वर लिहील्याप्रमाणे अमावस्येचा जन्म असल्यास आणि मुळ नक्षत्रात रवि असल्यास ( १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर ) जरा जास्त त्रास संभवतो. पुर्वाषाढा नक्षत्रात चंद्र आणि रवि असतानाही त्रास होणार आहे पण तो त्या मानाने कमी असेल. नविन काम सुरु करणार असाल तर गुंतवणुक कमी ठेवा. आईचे आरोग्य बिघडणार नाही हे पहा तसेच अमावस्येचा जन्म असताना आई- वडील या दोघांना जपा.

आता विवीध लग्नराशींना, धनु चंद्र रास असताना धनु राशीतल्या शनि भ्रमणाचा काय परिणाम होईल ते पाहु.

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.
तुळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुम्ही भाविक आहात. भावना जागृत ठेऊन उपासना करा. तुम्हाला नक्कीच कमी त्रास होईल. या काळात शनिशिंगणापुरला जा शनि महाराजांचे दर्शन घ्या. शनि महाराज नक्कीच कृपा करतील.

मकर रास 

तुमच्या राशीला साडेसाती साडे बावीस वर्षांनी सुरु होत आहे. ती पुढे साडेसात वर्ष सुरु रहाणार आहे. पहिल्या अडिचकीत शनी चंद्राच्या व्यय स्थानातुन भ्रमण करतो. हा काळ चांगला नसतो. लग्न राशी आणि चंद्र राशी दोन्ही मकर राशी असताना याचे जास्त वाईट परिणाम अनुभवाला येतील कारण भौतीक नुकसान होतेच म्हणजे पैसे अनावश्यक खर्च होतात किंवा ज्याला आपण नुकसान म्हणु होते शिवाय चिंता लागुन रहाते.

काही सुचवायचे आहे पहा जमते का.

१. आपण ठेवलेल्या सर्व ठेवींची कागदपत्रे बरोबर आहेत का ते तपासुन पहा. काही मुदत ठेवी संपलेल्या असतील तर पुर्नजीवीत करा म्हणजे व्याजाचे नुकसान टळेल. नोटबंदीमुळे रद्द झालेल्या सर्व नोटा सगळ्या बॅकेत जमा केलेल्या आहेत ना याची खात्री करा.
२. आपण घेतलेल्या सर्व शेअर्स चे टेक्नीकल अ‍ॅनेलिसीस पहा. अचानक काही बदल झालेले दिसत असतील आणि हे शेअर्स कोसळणार अशी शंका वाटत असेल तर आर्थीक सल्लागारांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्या.
३. ज्या गुंतवणुकीतुन अपेक्षीत फ़ायदा होत नसेल त्याकडे ही लक्ष द्या. त्या गुंतवणुकींचे नेमके काय करायचे यावर लक्ष द्या.
४. नाते संबंध ताणले गेले असतील तर त्यांना वेळ द्या.
५. जुनी दुखणी कायमची बरी व्हावीत म्हणुन आवश्यक वाटल्यास पॅथी बदलुन पहा. पर्यायी उपचार पध्दतीने रोग बरा होईल ते पहा.


असे म्हणतात की एक टाका वेळेवर घातला म्हणजे पुढचे अनेक टाके घालणे वाचते. ह्या साठी चक्क एक महिना हातात आहे.

यातुन काही नुकसान होणार आहे. त्याला इलाज नाही. काही शिकायला पण मिळणार आहे. शिकलेले आयुष्यभर उपयोगी पडणारच आहे. आपली आपल्या जाणते पणी म्हणजे वयाच्या १६-१८ वर्षांनी पहिलीच साडेसाती येत असेल तर वयाने जास्त असलेल्यांचा सल्ला ऐका.

आता साडेसाती निवारणार्थ उपाय पाहु

साडेसाती सुरु असताना दररोज अंघोळीनंतर खालील मंत्र किमान ११ वेळा म्हणा. म्हणताना शनि शिंगणापुरच्या शनिदेवतेचे ध्यान करा.

सुर्यपुत्रो दीर्घा देहि विशालाक्षा शिव प्रियः।
मंदाचारा प्रसन्नात्मा पीड़ां हरतु मे शनि ॥

दर  शनिवारी हनुमंताचे दर्शन सुर्यास्तानंतर घ्या. पाठोपाठ शनिमहाराजांचे घ्या. शनिमहाराजांना काळे उडीद, खडे मीठ, चमचा भर तेल, रुईच्या पानांचा हार अर्पण करा. शनिमहाराजांच्या समोर दिवा लावा. दिप दान करा. पाठोपाठ वरील मंत्र ११ वेळा म्हणा.

दर शनिवारी स्वत: तेल लाऊन अंघोळ करा म्हणजे शारिरीक व्याधी कमी होतील. साडेसातीत संकटे आल्यास १०० हनुमान चालीसाचे पाठ करा.

                                                     शुभंभवतु

१६ डिसेंबर ते १४ जानेवारी महिन्याचे भविष्य http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post.html

Friday, December 9, 2016

१५ डिसेंबर ते १४ जानेवारी काळासाठी राशी भविष्य

नमस्कार ज्योतिष प्रेमी वाचकहो,

आज मी पुन्हा ऑफ़ीस सुरु करुन तसेच राशीभविष्य लिहायला लागुन ३ महिने पुर्ण होत आहेत. आपल्या प्रतिसादामुळेच हा उपक्रम सुरु ठेवण्यास आनंद होत आहे. मागच्या महिन्याचे राशी भविष्य माझ्या ब्लॉगवर आजपर्यंत ३३६ जणांनी वाचले हा गेल्या तीन महिन्यातला विक्रम आहे. १५० लोकांना मी राशीभविष्याची लिंक पाठवली असता ३०० च्या वर लोक वाचतात ही पावती सुखावणारी आहे.

आपणास विनंती आहे की जर आपण हे राशीभविष्य नियमीत वाचु इच्छित असाल तर माझ्या ब्लॉगला subscribe करा  म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील.

१५ डिसेंबरला रवि धनु राशीत जात आहे आणि मागील महिन्यात रविला लागलेले शनिचे ग्रहणही संपत आहे. रवि हा तेज पुंज ग्रहांचा राजा जेव्हा शनि सोबत येतो रविचे कारकत्व बिघडते. राजकीय व्यक्तींवर संकटे येतात हे ही आपण मागच्या महिन्यात पाहिले. सुश्री जयललीता यांचा दुख: शेवट झालेला मागील महिन्यात पाहिला. वाचकांपैकी काहींना रवि वडीलांचा कारक असल्यामुळे वडिलांच्या आजारपणाचा सामना करावा लागला असेल. खास करुन तुळ राशीला मी हे लिहले होते. आज हे मी १० डिसेंबरला लिहीत आहे पण अद्याप १४ डिसेंबर पर्यंत त्याचा त्रास जाणवणार आहे.

डिसेंबर महिन्यात रवि अर्थात सुर्य धनु राशीला म्हणजे गुरुच्या राशीला जात आहे. या महिन्यात रवि व गुरु यांचा केंद्र योग होत आहे. दोन्ही ग्रह नेत्रुत्व गुणांनी भरलेले आहेत.  जनहितार्थ काम करणारे हे ग्रह जेव्हा केंद्र योगात ९ ते १४ जानेवारी काळात, भारताच्या व्यय स्थानातुन तसेच ते भाग्य स्थानातुन केंद्र योगात जात आहेत. परराष्ट्र खात्याच्या संदर्भात काही महत्वाचे घडेल असे दिसत आहे. गुरु हा फ़ायनान्स चा कारक आहे त्यामुळे नोटबंदी पाठोपाठ आणि महत्वपुर्ण निर्णय फ़ायनान्स संदर्भात आले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. ह्या निर्णयाचा संबंध बहुदा परकीय चलन, परकीय गुंतवणुक किंवा तत्सम असेल अशीही शक्यता आहे.

सामान्य माणसांना त्या काळ्या पैशाची पडलेली नाही. त्यांना आता तरी एटीएम च्या रांगा कमी होतील का ? असा प्रश्न पडलेला असेल. ११ डिसेंबर आणि २८ डिसेंबर या तारखांना अनुक्रमे मंगळ आणि शुक्र भारताच्या धनस्थानी जात असल्याने चलन टंचाई ११ डिसेंबर पासुन कमी होऊन ती २८ डिसेंबरला फ़ारच कमी झालेली असेल असे वाटते. आपण कॅशलेस कडेच वाटचाल करावी हे आता क्रमपाप्त असल्याने मी ही PAYTM सुरु केले आहे.

चला १५ डिसेंबर ते १४ जानेवारी काळासाठीच्या  राशी भविष्याकडे जाऊ

मेष रास :
महिनाभर नुसतीच पळापळ पण खिशात काही नाही. त्यात नोटबंदीमुळे चलन नाही अशी स्थिती खास करुन छोटे उद्योजक यांना मागच्या महिनाभर जाणवली असेल. नोकरदार ही शनि व रवि यांच्या प्रतिकुलतेने महिनाभर त्रस्त असतील. पण चांगली बातमी अशी की रवि तुमच्या भाग्यात जात आहे. खेळाडु असाल तर या महिन्यात नक्की यश असेल. कोणत्या तरी टीम मधे तुमचा समावेश झाल्याची बातमी येईल. शोध घेतलात तर तुमची स्वत:ची एक स्वतंत्र क्रिडा शैली तुम्हाला सापडेल जी सहजासहजी कोणीच कॉपी करु शकणार नाही.

२८ डिसेंबरला शुक्र लाभात जाईल. अविवाहीत असाल तर येणारी बातमी चांगली असेल. मुळचा शुभ ग्रह तुम्हाला  काही देण्यासाठी लाभात २०-२५ दिवस मुक्कामी असेल. १-२-३ जानेवारी तारखांना सुध्दा आईकडुन एक चांगला आशीर्वाद मिळेल जो सुख देऊन जाईल. एखादी जुनी लाईफ़ इन्शुअरन्स पॉलीसी मॅच्युअर होत असेल तर ती सुध्दा बोनसच्या रुपात अनपेक्षीत लाभ देईल.

मेष राशी वालो. एक महिनाभर सुखाचा आहे. शनिचा त्रास २६ जानेवरी नंतर जवळ जवळ संपणार आहे. असे एकंदरीत ग्रहमान आहे.

वृषभ रास

मंगळ २१ जानेवारी पर्यंत कुंभ राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात रहाणार आहे. महिनाभर नोकरी- व्यवसायात लढाई करायची आहे असे मागील महिन्यात सांगीतले आहे. हे लक्षात ठेऊन जर संभाव्य लढाईची तयारी चांगली केली असेल तर समाधान लाभेल की आपल्याला शरणांगती पत्करावी लागली नाही. तयारी केली नसेल तर मात्र पराभवातुन काही शिकण्याचे तंत्र आत्मसात केल्यास पुन्हा अशी शरणांगती पत्करावी लागणार नाही. ह्या लढाईत मनालाही जखमा होणार पण आहेत त्यामुळे आत्मविश्वास गमाऊ नका.२८ डिसेंबरला शुक्र दशमात उतरला म्हणजे शत्रु पळुन जाण्याची तयारी करेल तोवर खिंड लढवायची आहे. लढाई फ़क्त शक्तीवर आणि नशीबावर जिंकायची आहे. तडजोडीला फ़ारसा वाव असेल असे दिसत नाही. २३-२४ डिसेंबर तारखांना मनाच्या हिंमतीवर पार करायच्या आहेत.

या सगळ्या पार्श्वभुमीवर गुरुची मंगळावर दृष्टी आहे. दररोज सकाळी श्री गणपतीचे स्मरण करा. युध्दात यश देणारी आणि संकट हरण करणारी देवता श्री गणपतीच आहे.

मिथुन रास

मिथुन राशीचा स्वामी बुध १९ डिसेंबर ते ८ जानेवारी पर्यंत वक्री होणार आहे. प्रोफ़ेसर असाल तर आपल्याला झोपेतुन उठुन जरी लेक्चर द्यायला सांगीतल तरी उत्तम होईल असा खात्री असलेला लेसन बिघडेल. घरात सुध्दा हवे ते शब्द तोंडातुन न आल्याने काही गैरसमज होतील. शेअर मार्केट, इंन्शुरन्स एजंट खात्री असल्या शिवाय सल्ला देऊच नका अंगाशी येईल.

भाग्यात गेलेला मंगळ आपल्याला धाडस करा असे खुणावेल परंतु ८ जानेवारी पर्यंत फ़ायनान्स संदर्भात धाडस करु नका. २८ डिसेंबरला भाग्यात जाणारा शुक्र तुमच्या कलात्मकतेला एक नविन व्यासपीठ मिळवुन देईल. त्या संधीचा लाभ घ्या. तुमची कला प्रदर्शन करण्याची संधी २८ डिसेंबर नंतर सोडु नका आणि पहा आपल्या कलागुणांचे चीज होताना दिसेल. ३०-३१ तारखा या दृष्टीने फ़ारच महत्वाच्या आहेत. हो पण ज्या कलेत पाठांतराचा/ शब्द फ़ेकीचा/ बोलण्याचा भाग महत्वाचा आहे तो भाग दगा देणार नाही यासाठी जास्त कष्ट घ्या.

कर्क रास

 सप्तमामध्ये शुक्र आहे. त्याचे वास्तव्य २८ डिसेंबर पर्यंत आहे. इंग्रजी वर्षाअखेर अनेकांना सुट्टी असते. दुरच्या प्रेक्षणीय स्थळी सुट्टीवर सहकुटुंब जाण्याचे योग आहेत या दृष्टीने ही वर्षाखेर लक्षात राहील अशी असेल. अष्टमात मंगळ आहे हा तब्येतीचे काही छोटे त्रास दर्शवितो. पायाला खरचटणे, ठेच लागणे अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही आहे. हे फ़ार मोठे होणार नाही यास्तव प्रवासाला निघालात तरी रिस्क नको हा मंत्र लक्षात ठेवा. शुक्र २८ ला कुंभेत गेला तरी ३० व ३१ तारखांना चंद्र सप्तमात असल्यामुळे आनंदाला विरजण लागणार नाही.

१-२-३ तारखांना चंद्र-मंगळाची युती तीही अष्ट्मात होते आहे. हा लक्ष्मी योग आहे. शेअर मार्केट २ जानेवारीला उघडताच प्रॉफ़ीट बुक करायचा विचार असेल तर तांत्रीक बाजु पाहून निर्णय घ्या. याच काळात बुध वक्री असल्याने शेअर मार्केट मधे मोठे बदल दिसतील त्यामुळे निर्णय विचारपुर्वक घ्या. शेअर मार्केटमधुन असुदे किंवा लॉटरीचा १ जानेवारीचा बंपर ड्रॉ असुदे खिसा गरम होणार आहे.

सिंह रास 

तुमच्या राशीला महत्वाचा ग्रह रवि जो शनिबरोबर गेले महिनाभर असल्याने अनेकदा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे जाणवले असेल. ही स्थिती आता नाही. रवि १५ डिसेंबरला तुमच्या पंचमस्थानात येत आहे. हे स्थान नवनिर्मीतीचे आहे. आपली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जी काय खेळी करायची ती करुन टाका. ही खेळी नाविन्यपुर्ण असेल ज्यामुळे जे तुम्हाला वाकुल्या दाखवत होते त्या सर्वांना एक धक्का बसेल. नाविन्यपुर्ण पध्दतीने हा " जोरो का झटका धीरे से लगे" असा तुमचा प्रयत्न असेल.

राशीचक्रात सर्वात प्रमुख ग्रह रवि असतो तो जेव्हा शनिच्या युतीत जातो तेव्हा तुमची प्रतिष्ठा पणाला लागते शिवाय तुम्ही नाऊमेद होऊ शकता. पण आता हा महिना तुमचा आहे. रवि पुर्वेला उगवतो म्हणुन त्याला पुर्व म्हणतात. आता महिनाभर तुम्ही म्हणाल ती पुर्व याचा अनुभव नक्की येईल. सप्टेंबर २०१७ पर्यंत राहू तुमच्या राशीला आहे फ़ार धाडस नको. साधूने नागाला जी गोष्ट सांगीतली ती आठवा. साधूने सांगीतल्यामुळे नागाने फ़ुत्कारणे बंद केले परिणामी मुले जाता येता दगड मारु लागली. म्हणुन दंश करुन नका पण फ़ुत्कार सोडाच.

कन्या रास 

कन्या राशीचे लोक फ़ारच चिकीत्सक म्हणुन वधु- वर संशोधनात सुध्दा फ़ार वेळ घालवतात. हा मामला फ़ार चिकित्सेचा नाही तर आपल ह्र्दय काय सांगते हे तपासुन निर्णय घेण्याचा असतो. आजुबाजुला अश्या संधी महिनाभर असतील. त्याची जाणिव ह्र्दयकरुन देईल तेव्हा त्याची शास्त्रीय चिकित्सा करु नका. हवा तो जोडीदार मिळावा असे वाटत असेल तर २८ डिसेंबर पर्यंत फ़क्त ह्र्दयाचेच ऐका. तुमच्या राशीचे शुभमंगल होण्यासाठी हे वर्षभर गुरुमहाराज तुमच्या लग्नी येऊन बसलेत. पण तुम्ही निर्णय  घेणार असाल तर.

तुम्ही खुपच हुशार आहात, बुध्दीमान आहात आणि सर्व निर्णय बुध्दीला घासुन घेता हा तुमचा स्वभाव आड येतो म्हणुन तुमचे शुभमंगल लांबते आहे. तुम्ही ह्र्दयाचे ऐकुन निर्णय घेण्याची संधी वर्षातुन एकदा येते. गुरु अनुकुल असेल तर त्यावर लग्नाचे शिक्कामोर्तब होते.  तुम्ही निर्णय घेतलात तर जानेवारी महिन्याचा शेवटी लग्नाची तारीख पक्की होण्याचेही योग आहेत.

तूळ रास

साडेसातीचा भर आता ओसरला आहे. खुप मानसीक छळ होण्याचा काळ संपला असे या महिन्यात नक्की जाणवेल. कारण तुमच्या चतुर्थात चक्क शुक्र नावाचा शुभ ग्रह येऊन बसला आहे. १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत आनंद लुटण्याचा काळ आहे असे नक्की जाणवेल. या काळात चिंतारहीत जीवन जगाल आणि सुख साधानांचा आस्वाद घ्याल. २६ अक्टॊबरला साडेसाती संपते तोवर शनि उपासना सुरुच ठेवा.

२८ डिसेंबरला शुक्र तुमच्या पंचमस्थानात येईल. तुम्ही कलाकार असाल तर नवनिर्मीतीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. २८ डिसेंबर ते २८ जानेवारी हा महिना तुम्ही काही तरी नविन निर्माण करणार आहात हे नक्की. त्याच बरोबर तुम्हाला हा शुक्र त्याचे फ़ळ ही देऊन मग पुढे जाईल. तुमची रचना, तुमचे शब्द, तुमची सुरावट, तुमच संगीत, तुमचे चित्र, तुमचे व्यक्तीमत्व कोणाच्या तरी मनात आनंद देऊन जाईल.
इतके झाल्यावर प्रपोजल न येईल तरच नवल. तुम्हीही त्याकडे दुर्लक्ष करु नका. शब्द टाकताना, बोलताना फ़क्त विचार करा कारण बुध वक्री आहे. तुम्ही नको त्या शब्दात अडकुन पडाल. गुळाच्या गणपतीची गोष्ट जी "आहे मनोहर तरी" मधे सुनिता देशपांडे यांनी लिहलेली आहे. ज्यात फ़ार विचार न करता  पुल प्रपोजलवर सह्या करुन मोकळे होतात. ही गोष्ट वाचुन मगच सह्या करा किंवा शब्द द्या.

वृश्चिक रास 

सातही राशी जरा मनमुराद आनंद लुटावा अश्या मनस्थितीत असताना तुम्हाला ग्रहमान अजुन अनुकूल नाही असेच म्हणावे लागेल. साडेसातीची हीच ख्याती आहे. एक महिनाभर दम धरा. मधली अडचकी संपुन जेव्हा शनि, मंगळाच्या म्हणजे शत्रु राशीतुन सहा महिने बाहेर पडेल तेव्हाच सुटकेचा निश्वास सहा महिने टाका. २६ जानेवारीला शनि धनु राशीला जात आहे. त्याच परिणाम आत्ता दिसेल पण शांत रहा.

२०-२१-२२ डिसेंबर या तारखांना भाग्येश चंद्र तुमच्या लाभ स्थानातुन जात आहे. वर्षभर गुरु तिथे आहे त्यामुळे दरमहिन्याला ही एक स्थिती तुम्हाला १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आहे. जेव्हा जेव्हा चंद्र कन्येत जाईल तेव्हा काही चांगले घडेलच.

धनु रास

कुटुंबस्थानी असलेले शुक्राचे भ्रमण २८ डिसेंबर पर्यंत आनंद निर्माण करेल. हे स्थान खाणे-पिणे दर्शविते. भेळ-पाणी पुरी सारखे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थांची रेलचेल या काळात असेल. शुक्र तुमचा लाभेश असल्यामुळे एखादी नवी गुंतवणुक तुम्ही कराल. थोडक्यात व्यस्त जीवनात एखादी झुळुक यावी तसे घडेल.

मंगळाचे भ्रमण तुमच्या तृतीय स्थानातुन असणार आहे. तिसरे स्थान हे शौर्य स्थान आहे. मंगळ हा शौर्य, उर्जा आणि धाडस याचा कारक असल्याने तुमचे बाहु स्फ़ुरण पावतील. जरा शंख वाजला की आपल्याला शौर्य दाखवण्याची उर्मी दाटुन येईल. शौर्याला विवेकाने आवरा.  कारण जानेवारी च्या १४-१५ तारखांना शेवटी मंगळ आणि शनि यांचा केंद्र योग आहे. बुध ही वक्री आहे  धाडस अंगाशी येईल. गरज आणि खात्री असेल तरच धाडस करा. या धाडसाला प्लॅनिंगची जोड द्या. प्लॅन बी -सी तयार ठेवा. मग धाडस अंगाशी येणार नाही.

मकर रास 

मकर राशीला जानेवारी महिन्यात साडेसाती सुरु होते. सहसा शनि मकर आणि कुंभ राशीला पिडत नाही याचे कारण पत्रिकेत शनि फ़ारच बिघडला सेल तरच मकर आणि कुंभेचे लोक अनितीने वागतात. त्यांना हवे ते कष्टाने मिळवण्याचा स्वभाव असल्याने ज्याला पाप म्हणतात असे फ़ारसे घडत नाही. मग शनि शिक्षा देणार कशाची ? साडेसाती कष्ट देते पण मकर आणि कुंभ राशीचे लोक त्याला भित नाहीत.
काही तयारी मात्र आवश्यक असते. जुनी दुखणी, चुकीच्या गुंतवणुकी आणि बिघडलेली नाती मात्र सताऊ नयेत यासाठी या महिन्यात विचार करा.

तुमच्या राशीला शुक्र राजयोग कारक आहे. तो लग्नी येताना व्ययेश आणि तृतीयेश गुरु सोबत नवपंचम योग करतो आहे. शुक्र आणि गुरु भक्तीचे कारक ग्रह आहेत. शुक्र पंचमेश आहे त्यामुळे कवि असाल तर एखादी भक्तीरचना सहज सुचेल. २०-२१-२२  डिसेंबर तारखांना अनुपम योग आपल्या भाग्यात येत आहे. काय घडले ते सांगायला विसरु नका. मलाही उत्सुकता आहे.

कुंभ रास 

तुमच्या राशीमधुन मंगळाच भ्रमण सुरु आहे. शनिच्या राशीचा शांत पणा बिघडवणारे योग आहेत.  मुळच्या चंद्रावरुन मंगळ जाताना एखादा दिवस मनस्तापाचा जाईल. शनि दशमात आहे व तो या मंगळाशी केंद्र योग करतो आहे त्यामुळे जरा जास्त त्रास संभवतो. तेव्हा तुमच्या पध्दतीने आधीच संभाव्य कारणे शोधुन त्यावर विचार करुन ठेवा

२८ डिसेंबर पर्यंत दुरचे प्रवासाचे योग येतील. हा प्रवास शुभ असेल कारण तो शुक्र घडवणार आहे. त्यामुळे प्रवास वेळेवर व सुखदायक असतील. लाल डब्याच्या एस टीचे नाईलाजास्तव तिकीट काढले तरी ऐन वेळी ती उपलब्ध नाही म्हणुन आरामदायक २ बाय २ येईल आणि प्रवास सुखाचा होईल असे योग हा शुक्र देतो.

मीन रास 

२८ डिसेंबर पर्यंत शुक्र तुमच्या लाभस्थानी आहे. तो अष्टमेश आहे. शेअर मार्केटमधला प्रॉफ़िट बुक करायची चांगली संधी आहे. बुध वक्री होत असल्यामुळे मात्र हा निर्णय विचारपुर्वकच घ्या. लेखक असाल तर पुर्वी लिहलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती तुम्हाला लाभ देऊन जाईल किंवा जे प्रसिध्द झालेले नाही ते प्रसिध्द होताना येणारा लाभ आता मिळेल.

जे  येणार आहे ते जाणारही आहे कारण मंगळ व्यय स्थानात बसला आहे. परदेश वारी किंवा लांबचा प्रवास सुरु असताना तुम्ही हात आखडणार नाही हे निश्चीत. हे सर्व चालु असताना येणारे पैसे आणि खर्च याचा ताळमेळ बसणार नाही. इलाज नाही. तुम्हाला याचा फ़रक पडत नाही. मीन राशीचे लोक असले फ़ालतु विचार मुळी करतच नाहीत.

शुभंभवतु

Wednesday, November 9, 2016

१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य आणि कार्तिकेयाचे दर्शन

सर्व ज्योतिषप्रेमी वाचकांचे दिवाळी अंकाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य सुरु करण्यापुर्वी एक महत्वाची माहिती आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. या महिन्यात कार्तिक पोर्णिमा अर्थात त्रिपुरारी पोर्णिमा दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आहे. त्याच दिवशी कृतिका नक्षत्र सुध्दा आहे. महाराष्ट्रात कार्तिकेय फ़ारसे लोकांना माहित नाहीत. कार्तिकेय हे शिव-पार्वतीचे जेष्ठ पुत्र व गणपतीचे मोठे भाऊ. दक्षिणेत यांना विशेष पुजले जाते. या दिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्याने वर्षभर आर्थिक चिंता रहात नाही. कृतिका नक्षत्र १४ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजुन २७ मिनीटानी सुरु होते. यानंतर कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे. विधीवत पुजा करावी. रात्री १९ वाजुन २२ मिनीटांनी म्हणजे रात्रीचे ७ वाजुन २२ मिनीटांनी पोर्णिमा संपते तो पर्यंतच दर्शन घ्यावे.

जे वाचक पुण्याला रहातात त्यांना पर्वतीवर असलेल्या  मंदीरमधे दर्शन घेता येईल.  तसेच चिंचवड येथे पदमजी पेपर मिल्स - थेरगाव येथे सुध्दा कार्तिकेय मंदीर आहे. असेच मंदीर सातारा तसेच सोलापुर येथेही आहे. ज्या ठिकाणी दाक्षिणात्य पध्द्तीची मंदीरे असतात तिथेच प्रदक्षीणा मार्गावर कार्तिकेयाची मंदीरे स्थापन केलेली असतात. हे ही सोयीचे नसल्यास आपल्या घरी कार्तिकेयाचा फ़ोटॊ ठेऊन श्रध्देने पुजन करता येते.

आता मासिक भविष्याकडे जाऊ. या महिन्यात रवि अर्थात सुर्य वृश्चिक राशीत महिनाभर आहे. बुधाचा २८ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश, शुक्राचा मकर राशीत २ डिसेंबरला प्रवेश आणि मंगळाचा कुंभ राशीत ११ डिसेंबरला प्रवेश हे महत्वाचे बदल आहेत. वृश्चिक राशीतला रविचा महिना काहीवेळा काहीजणांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक जातो. खास करुन मुळव्याधीचे रोगी जास्त त्रस्त होतात. यासाठी फ़क्त दुपारी ताजे ताक सुंठ घालुन प्यावे. हिवाळा असल्याने शक्यतो रात्रीचे ताक पिऊ नये,

मेष रास : ११ डिसेंबरला मंगळ कुंभ राशीत जाईपर्यंत नोकरीच्या/ व्यवसायाच्या  ठिकाणी लढाई चालु असणार. २८-२९ नोव्हेंबर हे मनस्तापाचे दिवस असतील. त्याच बरोबर ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर हा काळ फ़ारसा चांगला असणार नाही. आरोप- प्रत्यारोप होतील. आपले इंटरेस्ट संभाळुन रहा. २५-२६ नोव्हेंबर आणि ५-६ डिसेंबरला मनासारख्या काही गोष्टी घडतील. हा महिना पेशन्स दाखवा. २६ जानेवारी पर्यंत  स्थिर रहा. दिवस सुखाचे येतील.

वृषभ रास : २८ नोव्हेम्बर नंतर बुध आपल्या अष्टमात जातो आहे. आपण व्यापारी असाल किंवा शेअर मार्केटमध्ये असाल तर आपले अंदाज चुकण्याचे योग आहेत. जोखीम घेऊ नका असे सांगणारा हा महिना आहे. या महिन्यात कामाचे चांगले प्लॅनिंग करा म्हणजे पुढील महिन्यात जेव्हा मंगळ दशमात जाऊन लढाईचे योग आहेत तेव्हा प्लॅनिंगला वेळ मिळणार नाही. ३०-३१ तारखा फ़ारश्या चांगल्या नाहीत तसेच सप्तमात होणारी ७ ते १४ डिसेंबरला होणारी रवि- शनि युती पती-पत्नी मधे  वैचारीक मतभेद निर्माण करेल. हे फ़ार मोठे वादळ असेल असे नाही.  २८-२९  नोव्हेंबर  हे दिवस चांगले जातील.

मिथुन रास : दिवाळीत सप्तमात आलेला शुक्र आपल्या सप्तमस्थानात २ डिसेंबर पर्यंत विराजमान आहे. पती-पत्नी यांना सुखसंवाद करायला उत्तम काळ आहे. ३० नोव्हेंबर  आणि १- २ डिसेंबर तारखा स्मरणात रहातील. अष्टमातला मंगळ तब्येतीचे दुखणे निर्माण करत नाहीना या कडे पहावे. ११ डिसेंबर पर्यंत कोणतेही दुखणे अंगावर काढु नका. भावंडासंबंधी काही समस्या उभी रहाण्याची शक्यता ७ ते १४ डिसेंबरच्या दरम्यान आहे. भावंडाशी या काळात वितुष्ट घेऊ नका. अडचणीत असतील तर मदत करा.

कर्क  रास : सप्तमस्थानात आलेला मंगळ पती-पत्नीमधे महिनाभर विनाकारण धुस-फ़ुस घडवेल. याकडे कसे पहायचे ते तुम्ही ठरवा, ही धुस-फ़ुस होऊ नये असे वाटत असेल तर ज्या गोष्टींमुळे हे घडु शकते ते टाळा. एखाद्या कौटुंबीक संमेलनाचा योग या महिन्यात येईल. अश्या वेळी हे संमेलन पत्नीच्या माहेरी असेल तर वेळात वेळ काढुन तिकडे जा. हे वादाचे कारण नको. आपण रियल इस्टेट क्षेत्रात नोकरी करत असाल आणि खास करुन मार्केटींग करत असाल तर यशाचा काळ आहे.  काही प्रॉपर्टी खरेदी- विक्री च्या प्रयत्नात असाल तर ते घडुन येईल.

सिंह रास : नोकरी - व्यवसाय आणि घरात महिनाभर तणाव राहील. घरात तुमचे म्हणणे कुणाला पटणार नाही. यावर एकच पर्याय आहे. तुम्हाला जे काय सांगायचे आहे ते प्रथम ज्याला ते पटकन समजते त्याला सांगा. आणि त्यालाच ते इतरांना सांगायला सांगा. नोकरी- व्यवसायात शत्रुंना नामोहरम करण्याची सुवर्ण संघी चालुन येईल. केवळ आपले सामर्थ्य दाखवुन शत्रुला नामोहरम करण्याची संधी घ्या. शत्रु पुढे अनेक दिवस डोके वर काढणार नाही.

कन्या रास: मुलांच्या प्रगतीची चिंता करावी लागेल. खास करुन या महिन्यात एखादी परिक्षा असेल तर मुले नीट अभ्यास करत आहेत ना याची  चौकशी करा. लहान मुले  असतील तर परिक्षेच्या काळात त्यांना मैदानी खेळ खेळायची लहर येईल. काही वेळ खेळायला हरकत नाही पण त्या खेळात कसली रिस्क नसते ना या कडे लक्ष द्या. मुले परिक्षेचा अभ्यास सोडुन दुरदर्शन वर फ़ार वेळ घालवत आहेत असे वाटले तर नक्कीच योग्य ते करा.

तूळ रास : आपण ७ ते १४ डिसेंबर काळात वडीलधारे व्यक्तींच्या तब्येतीकडे  दुर्लक्ष करु नका. त्यांना वेळेवर औषधे -उपचार करा. लेखक असाल तर हा महिनाभर उत्तम लेखन होईल. फ़ेसबुक - व्हॉट्स अपवरचे तुम्ही लिहलेले पोस्टला खुप प्रसिध्दी मिळेल. १८-१९ नोव्हेंबरला ही प्रसिध्दी खुप मिळेल.  घरचे वातावरण थोडेसे गरम असेल. कोणत्या कारणामुळे घरातली शांतता बिघडत आहे ते लक्षात घेऊन त्याचे निराकरण करा. काहींना प्रॉपर्टीचे घेण्याचे  योग २ डिसेंबर पर्यंत आहेत.

वृश्चिक रास :  महिनाभर कामाचा ताण जाणवेल. ११ डिसेंबर पर्यंत कामाच्या निमीत्तने लहान प्रवासही अपरिहार्यपणे करावे लागतील. तुमचे विचार अनेकांपर्यंत पोचवताना तुम्ही तहान भुक विसरुन काम कराल. जे पैसे डुबले असे वाटत होते त्याच्या वसुलीचे प्रयत्न २ डिसेंबर पर्यंत नेटाने करा. यश मिळण्याची शक्यता आहे. ७ ते १४ तारखांना अकस्मात संघर्षाला सामोरे जावे लागेल. हे का घडत आहे याची कारण मिमांसा करा. नुकसान नाही पण काही काळ  नाते संबंध बिघडण्याची शक्यता यामुळे आहे.

धनु रास : धनु राशीचे लोक काही काळे काम करतील अशी शक्यता नसते. पण डिसेंबर महिन्यात नाईलाजास्तव केलेले बेकायदेशीर कृत्य समोर येईल. काय घडु शकते याची कल्पना येताच परिस्थीती आटोक्यात राहील हे पहा. या शिवाय तुमच्या मनासारखे व्हावे असा काळ २ डिसेंबर पर्यंतच आहे. जे काही आजवर तुमच्या मनात आहे ते घडवण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. महिनाभर नविन लोक भेटतील. तुमचे मधुर नाते निर्माण होईल असा काळ आहे.

मकर रास : वरिष्ठांची नाराजी, किरकोळ कामातही बिघाड असे योग २ डिसेंबर पर्यंत आहेत. हाताखालचे लोक अचानक सुट्टीवर जाणे यासारखे प्रश्न वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांना हाताळावे लागतील. यातुन बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अधिक काम करावे लागेल. असे असुनही काही कामे मनासारखी होतील पण ती सहज होणार नाहीत. २८ नोव्हेंबर नंतर प्रवासाचे योग संभवतात. हे नोकरीच्या/ व्यवसायाच्या निमीत्ताने असणार आहेत त्यामुळे काम जास्तच पडेल.

कुंभ रास : नोकरी व्यवसायात आपल्या अधिकाराला आव्हान मिळेल. ते आव्हान निपटुन काढायला केवळ बुध्दी चातुर्य पुरे पडणार नाही तर त्याही पुढे जाऊन पैसा  खर्च होईल. हा महिनाभर अनेक लाभ होण्याचे योग आहेत. यामुळे अचानक खर्च आले तरी त्याची तजवीज झालेली असेल. दशमात असलेला रवि तुम्हाला यश देईल पण महिनाभर तुम्ही व्यस्त असाल. नोकरी व्यवसायात सरकारी मदतीने काही नविन प्रस्ताव येतील. हे फ़ायद्याचे असतील. याकडे आपण कसे पहाता यावर त्याचा फ़ायदा अवलंबुन आहे.

मीन रास:  या ना त्या मार्गाने पैसे हाती पडल्याने तुम्ही खुश व्हाल. उत्तम सुखाचा लाभ महिनाभर आपल्या राशीला आहे. आपले व्यापारी अंदाज बरोबर येतील. २५-२६ तारखांना होणारा किरकोळ मनस्ताप सोडला तर हा महिना स्मरणात राहील असे एकंदरीत ग्रहमान आहे. आलेले पैसे चांगल्या पध्दतीने गुंतवा हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. लग्न व्हायचे असेल तर स्थळे येणार आहेत. त्याबाबत अजुनही निर्णय घेतला नसेल तर घ्या. स्थळे नाकारुन वेळ निघुन गेली तर लग्न लांबेल.

Thursday, November 3, 2016

ज्योतिष वर्ग सुरु होत आहे.

सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यास करुन विशेष पात्रता मिळवण्याचा विचार करत असलेल्या किमान १२ वी किंवा जुनी ११ वी पास असलेल्या सर्व स्त्री व पुरुषासाठी चिंचवड येथे ज्योतिषवर्ग सुरु होत आहे. वर्ग सुरु होण्याची संभाव्य तारिख ४ डिसेंबर २०१६ रोजी आहे. वर्गाचा कालावधी आठवड्याला दोन तास असे पन्नास आठवडे म्हणजे एक वर्ष असेल. अभ्यासु व्यक्तीच्या सोयीने वर्ग शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ असा असेल. हा वर्ग झाल्यावर एक छोटीशी परिक्षा होऊन आपल्याला प्रमाण पत्र मिळेल.

घरकाम करणारा महिला वर्ग किंवा नुकताच सेवानिवृत्ती घेऊन निवृत्त आयुष्याची आखणी करणारे  तसेच तरुण पुरुष महिला यांनाही या वर्गात प्रवेश आहे. आपण या वर्गात प्रवेश घेऊन एका वर्षाने ज्योतिष सल्लागार बनु शकता किंवा या अभ्यासाने समाजाबरोबर उत्तम संवाद निर्माण करु शकता आणि आपले स्थान मिळवु शकता.

या वर्ग यशस्वी रित्या पुर्ण केल्यावर खालील सेवा आपण सहजपणे खालील सेवा उपलब्ध करुन देऊ शकाल.

१. नुकत्याच जन्मलेल्या बालकाची जन्मकुंडली संगणकाच्या सहायाने बनविणे किंवा अन्य कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जन्मकुंडली बनविणे.
२. नविन जन्माला आलेल्या बालकाची रास, नक्षत्र आणि त्यानुसार नक्षत्र नावाचे अद्याक्षर सांगणे.
३. जन्माला आलेल्या बालकाला जर जननशांतीची आवश्यकता असेल तर सांगणे.
४.  साप्ताहीक, मासीक यासाठी साप्ताहिक राशी भविष्य लिहणे.
५. लग्नासाठी विवाहगुण मेलन तसेच मंगळ दोष इ. पाहुन विवाह करण्याचा निर्णय देणे.
६. प्रश्न कुंडली मांडुन त्याच्या आधाराने प्रश्नाचे उत्तर देणे.
७. साडेसाती कधी असते व त्याच्या अनुषंगाने उपासना काय करावी याचे मार्गदर्शन.
८. इतर प्रश्नांची हाताळणी जसे विवाह कधी होईल, पत्रिकेत असणारे शुभयोग व त्याद्वारे उत्तम काळ मार्गदर्शन इ.
९. विवाह, उपनयन व इतर कामासाठी मुहुर्त काढणे.
१०. प्रश्नकर्त्याला उपासना सांगणे.

या वर्गाचे ठिकाण तसेच फ़ी किती असेल हे माहित करुण घेण्यासाठी फ़ोन करा किंवा फ़ोन करुन  प्रत्यक्ष भेटा. फ़ोन : 9763922176

भेटीचा पत्ता : नितीन जोगळेकर - सज्जन प्लाझा बेसमेंट, हिंदुस्थान बेकरी समोर, राहुल साडीज शोरुमच्या खाली, चाफ़ेकर चौकाजवळ
             चिंचवड पुणे - ४११०३३ 

Friday, October 28, 2016

नविन संकल्प


ज्योतिषप्रेमी वाचकहो नमस्कार,

९ सप्टेबर २०१६ रोजी मी पुन्हा एकदा दिवसाकाठी जास्त वेळ ज्योतिष विषयाला द्यायचा असे ठरवुन त्या नंतर हा ब्लॉग लिहायला सुरवात केली. सुरवातीला ब्लॉगची लिंक मी आपल्या नातेवाईकांना आणि स्नेह्यांना whatsapp वरुन पाठवली. ज्यात खास करुन मासिक भविष्य हा उपक्रम सप्टेंबर आणि अक्टोबर २०१६ ह्या महिन्यासाठी चालवला. हा पुढे कायमच चालु राहील.

यानंतरचा उपक्रम नक्षत्रप्रकाश ज्योतिषविषयक लेखांचा दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा होता. २६ अक्टोबर २०१६ रोजी तो ही पुर्ण झाला. ह्या तीनही गोष्टींना खुप प्रतिसाद ब्लॉगवर मिळाले. १००० पेक्षा  जास्त वाचक वर्ग लाभला.

यात नक्षत्रप्रकाशला मिळालेला प्रतिसाद खुपच जास्त म्हणजे नक्षत्रप्रकाश प्रसिध्द झाल्यावर तीन दिवसात पाचशे वाचक ब्लॉगवर येऊन गेले. हे सर्व फ़ेसबुकरील छंद ज्योतिषाच्या ह्या गृपमुळेच शक्य झाले. 

या पुढेही दरमहिन्याचे भविष्य आणि आणखी एखादा लेख किंवा ज्योतिषअभ्यासु लोकांसाठी एखादी केस लिहावी असा उपक्रम असेलच.

याशिवाय माझ्याशी संपर्क व्यक्तीगत स्तरावर न साधु शकणारे प्रश्नकर्ते यांच्यासाठी खालील सेवा उपलब्ध होत आहेत.

१. मराठी , हिंदि किंवा इंग्रजी भाषेत जन्मकुंडली बनवुन PDF स्वरुपात इमेलवर पाठवणे.
२. पत्रिका गुणमेलन लग्नाकरिता ज्यात गुण, मंगळ दोष आणि विवाहसौख्य याची चिकित्सा
३. अन्य प्रश्न व त्यावरचे उपाय 

या करिता काय फ़ी असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि फ़ीचे स्वरुप हे ऎच्छिक आहे हे मी सांगतो. दुरवर रहाणारे भारतीय  लोकांकरीता मी अकाउंटला पेमेंट करा असे न सांगता मी मोबाईल रिचार्ज स्वरुपात सांगतो जे सोपे आहे.

परदेशी व्यक्तींना मात्र असे करता येणार नाही म्हणुन माझा अकाउंट नंबर मी इमेल आल्यावर वैयक्तीक स्वरुपात ईमेल वर देईन.

या शिवाय अजुनही काही उपक्रम करण्याचा मानस आहे.

१. ज्योतिष वर्ग (मराठी) - हा उपक्रम चिंचवडला असणार आहे त्यामुळे पिंपरी- चिंचवड परिसरातले लोक याचा लाभ घेतील.
२. दुरशिक्षण युट्युब मार्फ़त व्याख्यान व त्या नंतर स्काईप द्वारे चर्चा असा  ज्योतिष वर्ग दुर असणारे प्रेमी घेतील.
३. ज्योतिष विषयावर संख्याशास्त्रीय संशोधन कसे करायचे याची सर्वमान्य पध्दत ठरविणे
४. ज्योतिष संशोधनाला प्रोत्साहन
५. ज्योतिष संशोधनपर लेखांना जर्नल द्वारे प्रसिध्दी प्राप्त करुन देणे
६. ज्योतिष परिषदांचे आयोजन करणे ज्यात ज्योतिषावर व्याख्याने व संशोधनपर निबंध वाचन असेल.

वाचकांना विनंती आहे की त्यांना कोणत्या उपक्रमात रस आहे हे खालील प्रकारे कळवावे.

1. इमेल - नितीन जोगळेकर - joglekar.nitin@gmail.com
2. दुरध्वनी - फ़ोन - 9763922176
3. Facebook - https://www.facebook.com/nitin.joglekar.9
4. Twitter - @joglekarnitin

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा.

दिपावली तसेच दिवाळी पाडव्याला सुरु होणारे नविन विक्रमसंवतसाठी शुभेच्छा !

नितीन जोगळेकर

Tuesday, October 11, 2016

१६ अक्टोबर ते १५ नोव्हेंबरचे राशी भविष्य

१६ अक्टोबर ते १५ नोव्हेंबरचे राशी भविष्य

मागच्याच महिन्याचे राशीभविष्य आल्यावर अनेकांनी १६ तारिख ला रविबदल होतो म्हणजे काय आणि त्याचा राशीभविष्यात काय Significance असा प्रश्न विचारला. साधारण २ १/४ दिवसांनी प्रत्येकाच्या राशीला चंद्र राशी बदलतो. इतक्या वेगाने राशीभविष्यात बदल होत असतो. रवि अर्थात सुर्य दर महिन्याच्या साधारण १६ तारखेला राशी बदल करत असतो. रवि सोबतच शुक्र आणि बुध हे ग्रह असतात त्यामुळे या तारखेच्या पुढे किंवा मागे पण दर महिन्याला त्यांचे पण राश्यांतर होत असते. म्हणुन मासीक राशीभविष्य लिहायला साधारण रविचे राश्यांतर होण्याचा काळ मला योग्य वाटतो.

या शिवाय मंगळ साधारण पणे दर दोन महिन्याला राशी बदल करतो. गुरु साधारण दर १३ महिन्यांनी राश्यांतर करतो  तसेच राहु आणि केतु साधारण पणे १८ महिन्यांनी राश्यांतर करतात. ज्याला आपण खुप भितो तो शनि  साधारण पणे २ १/२ वर्षे एकाच राशीत असतो. शनि २४ जानेवारी २०१७ ला धनु राशीत जाईल आणि तुळ राशीची साडेसाती संपेल.

याच महिन्यात दिवाळी येते तेव्हा माझे वार्षीक भविष्य माझ्या ब्लॉगवर प्रसिध्द होईल.

आता महिन्याचे राशी भविष्य पाहु. आज दसर्य़ाच्या मुहुर्तावर मासीक तसेच वार्षीक राशीभविष्य लिहीण्याचा मानस आहे. बाकी सिमोलंघन म्हणजे आपण चालत सीमा पार करणे इतका साधा न घेता, विचारांच्या सीमा ओलांडुन नविन विचार करणे असाही घेता येईल.

मेष राशी : आपल्या राशीला महिनाभर रवि सातवा राहिल. अर्थातच लग्न झालेले नसेल तर रवि आणि बुध हे दोन ग्रह आपल्या सप्तम म्हणजे विवाह स्थानातुन महिनाभर भ्रमण करणार आहेत. मेष राशीला रवि पंचमेश आहे. तो सप्तमात गेल्याने आपले प्रेम व्यक्त करण्यास आणि विवाह त्याच व्यक्तीबरोबर करण्याचा मानस असल्यास सुयोग्य काळ आहे. लगेच विवाह होईल असे नाही पण किमान हे प्रपोजल पुढे जाणार आहे. विद्यार्थी वर्गाने सहामहीत जरा जास्तच अभ्यास करा. वर्षभर राहु ऐन वेळेला विसरणे असा प्रभाव देणार आहे म्हणुन काळजी घ्या. दिवाळीच्या मुहुर्तावर एखादे लॉटरीचे तिकीट घ्या. बिन कष्टाचे पैसे मिळणार आहेत. १ नोव्हेंबरला जेव्हा मंगळ दशमात जाईल तेव्हा आपल्या नोकरी व्यवसायात लढाईचे वातावरण असेल ते ११ डिसेंबर पर्यंत असेल. लढाईत विजय हवा असेल तर प्लॅनिंगला महत्व आहे.

वृषभ राशी :  सप्तमात शनि महाराज गेले दोन वर्षे ठाण मांडुन आहेत. जोडीदाराशी विसंवाद सुरु असेल पण सप्तमस्थानातला शुक्र दिवाळीचा सण आनंदात संपन्न करायला समर्थ आहे. पत्नीला पाडव्याला चांगली भेट वस्तु द्याच. कायदा दाखवुन  विरोधकांचे तोंड महिनाभर बंद ठेऊ शकाल. १ नोव्हेंबर पर्यंत मंगळ अष्टम स्थानात आहे. मुत्र विकार, उष्णता या कडे दुर्लक्ष करु नका. पंचमात वर्षभर असलेला गुरु विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अभ्यासाला पोषक आहे. पण अभ्यास करायलाच हवा.

मिथुन राशी : बरेच दिवस तुम्हाला काळ बरा नव्हता तो आता होतोय.  आधी नोकरीच्या ठिकाणी १८ सप्टेंबर पासुन जोडीदाराबरोबर संघर्ष असा काळ घालवला असेल तर खात्री बाळगा आता बरा काळ येतोय. ७  नोव्हेंबरला सप्तमात येणारा शुक्र जोडीदाराबरोबर काही कटुता आलीच असेल तर ती संपवेल. १ नोव्हेंबरला मंगळ तुमच्या अष्टमात जात आहे. वडीलोपार्जीत प्रॉपर्टीचा काही लाभ होणे शक्य असेल तर त्या दृष्टीने हालचाली होतील.  या बाबतीत तुम्ही काहीच केलेले नसेल तर पुढे जा. त्याच बरोबर आरोग्य संभाळा.

कर्क राशी :  मंगळ तुम्हाला राजयोग कारक ग्रह आहे. तुम्ही रिअल इस्टेट मध्ये काम करत असाल तर १ नोव्हेंबर पासुन साधारण पुढे ४० दिवस अनुकुल काळ आहे. तुम्ही बिल्डर असा किंवा इस्टेट एजंट अनेक कामे मार्गी लागताना दिसतील. व्यापारात अनेकांना या चाळीस दिवसात मरगळ दुर होऊन हालचाली झालेल्या दिसतील. तुम्ही कलाकार असाल तर पंचमातला  शुक्र तुम्हाला ९ नोव्हेंबरच्या आधी नवनिर्मीतीत यश किंवा एखादी परफ़ॉर्मन्स करण्याची संघी घेऊनच आलेला आहे. ही संघी काहीतरी नविन करण्याची आहे. त्याचे सोने करा.

सिंह राशी : या दिवाळीत काय खरेदी करणार आहात ? ज्याला सुख-सोय म्हणता येईल अशी एकतरी वस्तु या दिवाळीत घरी येईल. वहान असो की  आरामदायक फ़र्निचर आपण खुष होणार आहात कारण आपली इच्छापुर्ती होणार आहे. ही वस्तु मिळाली म्हणजे सुख मिळते हा गैरसमज आहेच पण आजच्या काळात स्टेट्स सिंबॉल्स ला खुप महत्व दिले जाते. पण खरोखरी सुखाचा काळ जेव्हा  शनि जेव्हा तुमच्या चतुर्थातुन बाहेर पडेल तेव्हाच येईल. त्यासाठी जानेवारी पर्यंत वाट पहा. १ नोव्हेंबरला मंगळ तुमच्या सहाव्या स्थानी येईल तेव्हा तुमच्या विरोधकांची तो वाट लावणार आहे. कोणीही आपला कायमचा शत्रु नसतो हे जाणुन त्यांच्या वाईट काळावर हसु नका.

कन्या राशी : तुमच्या तृतीयात शुक्र ७ नोव्हेंबर पर्यत आहे. तो बाहेर पडला की बुध येत आहे. लिखाण व्हावे असे वाटत असेल तर जोर करा. या साठी लागणारी विचारांची बैठक तयार करण्याचे काम शनि गेले दोन वर्षे करतो आहे. आपले लिखाण प्रसिध्द होणे हे आता प्रकाशकाच्या मर्जीवर राहिले नसुन ब्लॉगच्या माध्यमातुन दर्जेदार लेखन येत आहे. तसा वाचकवर्ग ही तयार होत आहे. मग कशाची वाट पहात आहात? १ नोव्हेंबरला मंगळ पंचमात गेला की लेखनाला मनाची अनुकुलता होण्यास चांगला काळ होईल. हे सर्व वाचले की कन्या राशी वाले म्हणतील की आम्ही सगळेच लेखक थोडीच असतो परंतु लेखन हे अभिव्यक्तीचे साधन आहे. लेखक नसलेली मंडळी किमान व्यक्त व्हा. आपले विचार मुद्देसुद करुन बोला. याचा परिणाम आपल्या सभोवताली दिर्घ काळ रहातो. जो बोलतो किंवा व्यक्त होतो त्याची माती सुध्दा विकली जाते आणि जे मुल रडते त्याच्याकडे  त्याची आई लक्ष देते हे काय सांगायला पाहिजे ?

तुळ राशी : रवि तुमचा लाभेश आहे. लाभेश जेव्हा तुमच्या राशीत येतो तेव्हा तथास्तु हा शब्द घेऊनच येतो. पुढचा महिनाभर तुम्हाला वडीलांकडुन काही अपेक्षीत असेल तर ते मिळेल. आरोग्याचा लाभ होईल. सरकारी पत्र येणे, निर्णय येणे अपेक्षीत असेल तर नक्की प्रयत्न करा. सरकारी लोक स्वयंस्फ़ुर्तीने काम करत नाहीत हा व्यवहार आहे. तो विसरुन चालणार नाही. ७ नोव्हेंबर पर्यंत शुक्र तुमच्या धन स्थानात आहे. फ़क्त भेळ, चाट या सारखे पदार्थ अनेक वेळा खाण्याचा योग आहे यावर आनंदात न रहाता आलेली रोकड मुदत ठेवीत किंवा सोने खरेदीत गुंतवा.

वृश्चिक राशी : महिनाभर रवि व्यय स्थानात आहे. सरकारी कामे वेळेवर होणार नाहीत. सरकारी कामकाजाचा त्रास होईल. वडील वृध्द असतील तर लक्ष द्या. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. गेले महिनाभर रागावलेले शुक्र आणि बुध सध्या प्रेमात आहेत त्याचा लाभ करुन घ्या. निर्णय घेताना आता त्रासदायक वाटणार नाही. ८ नोव्हेबरला बुध तुमच्या राशीला आल्यामुळे काही अपेक्षा चटकन पुर्ण होतील. साडेसातीतले शेवटचे पर्व येऊ घातले आहे. अजुनही खुप चांगला काळ आहे अस नाही पण सुसह्य नक्कीच होत आहे.

धनु राशी :  तुम्हाला हा महिना बरा जाईल. आवक चांगली राहील त्याबरोबर खर्चाची तरतुद आहेच पण समतोल तर साधला जाईल असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी  संमीश्र जावी असेच ग्रहमान आहे. कारण एकच आहे. कामे पडली अनंत. सुख घ्यायला वेळ नाही. घोडा उभ्या उभ्या झोप घेतो म्हणे. तुमच्या राशीचे चिन्ह अर्धा माणुस आणि अर्धा  घोडा आहे. त्यामुळे अर्धी झोप उभ्यानेच घ्या. ताजेतवाने व्हा. कामाला लागा. अजुन वर्षभर  खुप काम आहे.

मकर राशी :  या महिन्यात तुम्हाला तात्पुरता अधिकार योग आहे. त्याच बरोबर आर्थीक गणिते सुध्दा नियंत्रणात रहातील. मंगळ थोडेसे खर्च वाढवणार आहे पण तुमचा स्वभाव त्यावर नियंत्रण घालायला समर्थ आहे त्यामुळे चिंता करु नका. दिवाळी चांगलीच जाणार आहे. १ नोव्हेंबरला दिवाळी नंतर काही अपेक्षा पुर्ण होतील. वहानाचे बुकिंग केले असेल तर डिलिव्हरी १ नोव्हेंबर नंतरच मिळेल असे योग आहेत. पण हरकत काय आहे ?

कुंभ राशी :  रवि बुध भाग्यात, शुक्र दशमात आणि मंगळ लाभात. गुरु अनुकुल नसल्याने जे  त्रास आहेत त्यावर काही काळ तरी चांगले घडेल असे वातावरण पुढील दोन महिने आहे. लाभ उठवा. कुंभ राशीचे लोक भविष्य पहाण्याच्या नादात आणि काय घडेल याच्या विचारात खुप वेळ घालवतात. आपली इच्छा शक्ती जागृत करा अनेक समस्या मार्गी लागतात या विधानाला पुरक असे वर्तन करा. दिवाळि आनंदात जाईल अजुन या महिन्यात काय पाहिजे ?

मीन राशी :  हा महिनाभर रवि अनुकुल नाही. दिवाळीच्या फ़राळाची चव घ्या पण चवी पुरतीच. अतिरेक नको. एक रवि सोडला  तर या महिन्यात बुध -मंगळ शुक्र हवे ते दान देण्यासाठी तत्पर आहेत. दशमातला शुक्र तुम्हाला अचानक उत्तम संधी देईल. भाग्येश मंगळ दशमात आल्याने महिनाभर  व्यावसायीक अनुकुलता असेल. बुध सुध्दा अनुकुल असल्याने जे विचार तुम्हाला पाठपुरावा करत आहेत त्या दिशेने अपेक्षीत घडुन येताना दिसेल. अर्थात प्रयत्नांची कास धरुनच हे  मिळणार आहे हे नक्की.

शुभंभवतु

Thursday, September 22, 2016

विवाह लवकर व्हावा यासाठी उपवर मुलीने करावयाची पुजेची माहिती


ज्यांचा विवाह ठरण्यास अडचणी येत आहेत अश्या उपवर विवाह इच्छुक कन्यांसाठी नवरात्रातील षष्ठी तिथी कात्यायनी देवीची पुजा करण्याचा दिवस आहे. या दिवशी कात्यायनी देवीची पुजा केली असता विवाह होण्यातले अडथळे तसेच प्रेमविवाह होण्यासाठी येणारे अडथळे दुर होतात असा  अनुभव आहे.

अश्विन महीन्यात शारदीय नवरात्रात येणारा ३ अक्टोबर २०१९ हा दिवस  सायंकाळी ६ नंतर या पुजेला अनुकुल दिवस आहे.  कात्यायनी देवीचे वरील चित्र स्थापन करुन  किंवा खालील लिंक मधे दिलेले यंत्र उपवर विवाह इच्छुक कन्येने किंवा उपवर मुलाने सायंकाळी पिवळे किंवा लाल वस्त्र धारण करुन पुजा करावयाची आहे. यात देवीला पिवळे फ़ुल/फ़ुले वहायची,पाच हळकुंडे  तसेच पिवळ्या रंगाचा नैवेद्य तसेच मध अर्पण करायचा असतो. हात जोडुन  विवाह त्वरीत तसेच मनासारखा पती किंवा पत्नी ( उपवर मुलांनी म्हणायचे संकल्पामधला बदल ) मिळावा यासाठी जप करत आहे असा संकल्प करावा.

या पुजेसाठी अवश्यक साहीत्य अमेझॉन वर मिळण्यासाठी ही लिंक

1. https://amzn.to/2ZTruue  कात्यायनी यंत्र

3. https://amzn.to/2HRHqH0  हळकुंडे

या पुजेनंतर  १०८ वेळा खालील मंत्राचा जप करावा.

हा जप उपवर मुलींनी असा म्हणावा

" कात्यायनी महामाये महायोगिन्यधीवरी नंदगोपीसुतं देवी पतिमे कुरु ते नम:"

हा जप उपवर मुलांनी असा म्हणावा

" कात्यायनी महामाये महायोगिन्यधीवरी नंदगोपीसुतं देवी पत्नीमे कुरु ते नम:"

(  मुलांनी जप करताना वरील मंत्र नीट वाचावा व फ़रक समजून घ्यावा . या मंत्रात मुलांनी जप करताना पति ऐवजी पत्नी हा शब्द उच्चारणे अपेक्षीत आहे.  )

हा जप व पुजा ज्यांचा विवाह व्हायचा आहे अश्या मुलींनी/मुलांनी करणे अपेक्षीत आहे.

त्यांना वेळ नाही म्हणून अन्य कोणी केली तर फ़ळ मिळेल अशी शक्यता नाही.

मंत्र जप झाल्यावर प्रार्थना पुर्वक आपली इच्छा पुर्ण व्हावी अशी मनात प्रार्थना करावी. व नंतर हळकुंड पिवळ्या कापडात बांधुन ठेवावे. हे कापड असलेली हळकुंडे जो पर्यंत विवाह होत नाही तो पर्यंत कायम झोपताना उशाशी ठेवावी. विवाह जमला तर ही हळकुंडे हळदी समारंभात कुटून हळद करुन वापरावी.
सहा महिन्यांच्या आत लांबलेला विवाह जमतो किंवा होतो असा अनुभव आहे.

१६ सप्टेंबर ते १५ अक्टॊंबर कन्यारवी महिन्याचे राशीनिहाय भविष्य

१६ सप्टेंबर ते १५ अक्टॊंबर या काळात रवि अर्थात सुर्य कन्या राशीत असतो. कन्या ही चिकित्सक राशी आहे. या राशीचे लोक अतिशय चिकित्सक असतात. खास करुन या महिन्यात जन्माला आलेले  कन्या राशीचे ( चंद्र कन्या राशीत असलेले ) अजुनच चिकीत्सक असतात. स्वच्छता या राशीचा गुण पण कधी कधी ते स्वत: यामुळे हैराण होतात. हात धुवायला साबण असेल तर डिस्पेन्सर का नाही. हात धुतल्यावर ज्याला हात पुसले तो नॅपकीन स्वच्छ होता का या शंका आणि त्यामुळे येणारी मानसीक व्यग्रता त्यांना त्रास देते.

आता राशीवार भविष्याकडे जाऊ

मेष रास:  ह्या महिन्यात रवि आपल्या सहाव्या म्हणजे नोकरी  व्यवसायाच्या ठिकाणी जाणार आहे. जिथे गुरु आधीच आहे. महिनाभर आपल्याला काही विषीष्ठ अधिकार प्राप्त होतील. डेप्युटेशन विथ पॉवर असा भाग आहे. काळजी पुर्वक निर्णय घ्या. १८ तारखेनंतरचे निर्णय चांगले असतील कारण मंगळ धनु राशी जाईल आणि त्याचे शनिबरोबर असलेले गोष्टी बिघडवायचे कॉन्ट्रॅक्ट संपेल. १३ अक्टोबर पर्यंत शुक्र सप्तमात आहेच. नविन करार त्या आधी करा.   प्रेमी असाल तर आपली प्रिय व्यक्तीच्या सहवासात हा काळ जास्त जाईल. २२ तारखेपर्यंत शब्द देऊ नका. शब्द जपुन वापरा.

वृषभ रास:  १८ तारखेपासुन मंगळ अष्ट्मात गेला आहे. आगीतुन फ़ुफ़ाट्यात असे नको व्हायला असेल तर उष्ण्तेच्या विकारापासुन संभाळा. नोकरीच्या फ़्रंटवर महिनाभर वातावरण बरे राहील.  वृषभ राशीचे लोक कष्टाळु आणि सेटींग करण्यात पटाईत असतात त्यामुळे  नोकरीत काय कुठेच फ़ारसे तणाव निर्माण होऊ देत नाहीत. घरच्या फ़्रंट्वर वातावरण तापलेले असेल तर निवळेल.

मिथुन रास:  मागिल दोन तीन महिने तुमचे विरोधक तुम्ही आडवे पाडले असतील. अर्थातच तुमच्या सवयी प्रमाणे बोलबच्चन करुनच. शारिरीक स्तरावरची लढाई तुम्हाला मानवत नाही.  पंचमातल्या तुळेच्या शुक्राकडे पहाल की नाही ? प्रेमाचे वचन द्यायचे असेल असे ठरवले असेल तर द्या की. १३ अक्टोबर पर्यंत काळ चांगला आहे. अगदी प्रपोज करायचे असले तरी करुन टाका.  विवाहीत असाल तर मात्र जरा जपुन. ३ नोव्हेंबरपर्यंत वातावरण स्फ़ोटक राहील. दिवाळी येत आहे. जोडीदाराच्या दिवाळी भेटीचे बजेट दुप्पट करा आणि काही काळ तरी भांडण टाळा.

कर्क रास: काय मजा आहे ना ? तुळेचा शुक्र तुमच्या चतुर्थात आहे. राजभोग घेताय ना ? लेखक असाल तर महिनाभरात लिहुन हातावेगळे कराच.  नोकरीत असाल तर १८ तारखेपासुन गंमत पहा. तुम्हाला रडविणारे आता रडतील. ३ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हव्या त्या गोष्टी घडवा. २२ तारखेपर्यंत बोलला नसाल तर पुढेही बोलण्याची वेळ येणार नाही.

सिंह रास : रवि तुमच्या राशीतुन बाहेर पडुन कन्येत गेलाय जिथे गुरु विद्यमान आहे. या महिन्यात आपल्या कुटुंबाची संख्या किमान १ ने वाढेल. किमान अशी शुभ वार्ता तरी येईलच. शनि- मंगळाने सौख्य हानी झाली होती. गेले २-३ महिने जो त्रास भोगला तो आता १८ तारखेपासुन कमी होईल. १३ अक्टोबर नंतर शुक्र चतुर्थात आल्यावर  दिवाळी नक्कीच आनंदमय होईल.

कन्या रास :  तुम्ही चिकीत्सक आहात तरी पण २२ तारखेपर्यंत केलेले व्यवहार पुन्हा तपासुन पहा. काही गफ़लत तर नाही ना झाली. शुक्राने आवक वाढवली असेल आणि तुम्ही गुंतवणुक करुन बसला असाल म्हणुन जरा लक्ष द्या. बंधु-भगीनी काय म्हणतात. जे काय गैरसमज झाले असतील ते दिवाळीत मिटवा. १८ तारखेपासुन चतुर्थात मंगळ येतो आहे. तो अष्टमेश आहे. थोडी तरी सौख्य हानी होणार आहे. डॊक्याला तेल लाऊन मगच झोपा.

तुळ रास : घरातल्या कुरबुरी १८ तारखेपासुन कमी होतील. रवि व्ययात आहे. उगाच पोलीसांना / सरकारी नोकरांना कायदा शिकवायला जाऊ नका. तो शर्मा बेकायदेशीर बांधकाम करुन परत पंतप्रधानांना शिकवायला गेला  तसे व्हायचे. खर्चावर नियंत्रण वर्षभर हवे आहे. या महिन्यात तर खासच. कुणाला २२ तारखेपर्यंत हात उसने दिलेले असेल तर मुदत टळायच्या आधीच तगादा लावा. मीच उशीरा भविष्य लिहायला लागलो नाहीतर मागच्याच महिन्यात देऊ नका म्हणुनच सांगीतले असते.

वृश्चिक रास : वर्षभर पैसे मोजायचे आहेत. या महिन्यात जरा जास्तच मोजा. सरकारी काम करणारे कंत्राटदार या महिन्यात वसुल करा. शासनाकडुन काही पैसे येणे असेल तर सेटींग लावाच. तब्येत काय म्हणते ? आता काही दुखण असेल तर आराम पडेल. घरच्या वातावरणात ताण येईल असे घडु देऊ नका. घरच्या मंडळीकडुन दुखावला गेलात तरी गप्प रहा. शेवटी आपली माणसे आहेत. साडेसाती आहे. इलाज नाही.

धनु रास : या महिन्यात नुसती पळापळ आहे. मी ही ज्योतीष कार्यालय उघडलय आणि दुपारचे लवंडायचे सोडुन नविन ब्लॉग लिहायला घेतलाय. गुरु मागच्या महिन्यात दशम स्थानात गेलाय पण रवि दशामात गेल्यावर खरी पळापळ सुरु झाली आहे. महिनाभर उसंत मिळणार नाही. चांगले प्लॅनींग करा. कामे आपोआप हातावेगळी होतील. पुढच्या महिन्यात दिवाळीसाठी पैसे हवे असतील तर महिनाभर कामच करा.

मकर रास :  गुरु भाग्यात आहेच. त्यात आत्माच्या कारक रवी येतो आहे. गुरु दर्शन देणार. प्रचिती येणार हे निश्चीत. अर्थातच साधना काय केली आहे तसेच फ़ळ मिळणार आहे. दशामातला शुक्र तुम्हाला हा महिना तरी नोकरीत सुखासुखी दान देणार आहे. काही नाही तर पळापळ नक्कीच असणार नाही. १८ तारखेला मंगळ महाराज व्ययात गेले आहेत. दिवाळी आहेच दिवाळ निघणार नाही याची काळजी घ्या. खर्चाचे प्लॅनिंग  कराच.

कुंभ रास :  नोकरीच्या ठिकाणचे स्फ़ोटक  वातावरण संपुन जरा बरा काळ येईल. गुरु नाही आणि रवीही अनुकुल नाहीच. हा महिना जरा अ‍ॅडजेस्ट करुन  घ्या. पुढच्या महिन्यात जरा अजुन वातावरण बदलेल. कष्टच जास्त आहेत. निष्कारण डोक्याला तापच करु नका. रात्री डोक्याला तेल लावा आणि निवांत झोपा.

मीन रास : स्थळ पहाताय ? जमेल हो नक्की जमेल. हा महिना काय घेऊन काय घेऊन येतो ते पहा. १८ तारखेपासुन सर्वच फ़्रंटवर लढाई आहे पण काळजी नसावी. दुख: भरे दिन बीते रे भय्या अब सुख आयो रे .. पळापळीत या उक्तीचा अनुभव येईल. नोकरीत /व्यवसायात गाडी डी -रेल होता होता राहीली ना ? आता काही बाकी नाही राहिल.  दिवाळी पळत पळत का होईना सुख देऊन जाणार आहे.

                                                  । शुभं भवतु ।