Monday, June 25, 2018

व्हावे मोकळे आकाश

व्हावे मोकळे आकाश

१९९२ सालची दिवाळी मधे एक पुस्तक माझ्या हाती पडले. पुस्तकाचे नाव होते अंधश्रध्दा एक प्रश्नचिन्ह. लेखक डॉ. नरेंद्र दाभोळकर. ( मी स्वत: डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली याचा निषेध करतो. कुणाचीही हत्या याने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत असे माझे मत आहे. डॉ नरेंद्र दाभोळकरांनी केलेले भानामती, करणी, बुवाबाजी या विरुध्दचे काम हे अत्यंत प्रशंसनीय आहे ) या पुस्तकात कशावरुन ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली असा प्रश्न डॉ साहेबांनी विचारला होता. यासंदर्भात आमचा पत्र व्यवहार झाला तेंव्हा फ़लज्योतिष अशास्त्रीय आहे असे मत त्यांनी लिहले आणि किंबहुना मी ज्योतिष यासाठी शिकायला लागलो.

मी तीन कुंडल्या देतो. या व्यक्ती जिवंत की मृत हे आव्हान  अंधश्रध्दा निर्मुलन समीतीने भारतातल्या ज्योतिषांना काही वर्षांपुर्वी दिले. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने ते अनेक वर्षांपुर्वीच स्विकारले आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आ्जही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने दिलेली उत्तरे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी घातलेल्या अटी झाकून आजही एखादी व्यक्ती मृत आहे की जिवंत असा अशास्त्रीय प्रश्न विचारण्याची प्रथा सुरु ठेवली आहे. माझ्या मते ज्या गोष्टीचे उत्तर ज्योतिष शास्त्रा शिवाय मिळते, तो प्रश्न का विचारायचा ?

भारतीय दंडसंहीतेने सुध्दा परागंदा व्यक्ती सात वर्षे पर्यंत गायब असल्यास त्या व्यक्तीच्या जोडीदाराला विवाह बंधनातून मुक्त होण्याची परवानगी देऊन आपली मुक्तता केली असताना, ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याची सक्ती मात्र ज्योतिष मानणार्या व्यक्तींना केली जाते. अन्यथा ज्योतिष हे शास्त्रच नाही असे आम्ही म्हणु अशी धमकी दिली जाते.

"So far as prayer related to astrology is concerned, the Supreme Court has already considered the issue and ruled that astrology is science. The court had in 2004 also directed the universities to consider if astrology science can be added to the syllabus. असा स्पष्ट निर्वाळा सुप्रिम कोर्टाने दिला आहे.

२००४ मधे ज्योतिष हे शास्त्र आहे, भारतीय उच्च महाविद्यालयातून ज्योतिष शिकवले जावे असा स्पष्ट निकाल दिलेला असताना महाराष्ट्रात पुन्हा एक याचीका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. ही याचीका जनहित मंच च्या वतीने भगवानजी रियानी आणि त्यांचे सहकारी दत्ताराम कुमकर यांनी  दाखल केली होती.

The (PIL) filed by Janhit Manch and its convener Bhagwanji Raiyani, along with his associate Dattaram Kumkar, had questioned the validity of predictions by many well-known astrologers.

ही जनहितार्थ याचीका मुंबई हायकोर्टाने फ़ेटाळून यापुढे ज्योतिष विषयाला भारतीय दंडसंहिता च्या या जाहीरात विषयक कायद्याच्या अंतर्गत आव्हान देता येणार नाही असे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

माझ्या माहितीत आज ज्योतिषशास्त्र विरोधात कोणतीही जनहितार्थ याचिका प्रलंबीत नाही. मी जेंव्हा ज्योतिषशास्त्र असे लिहले आहे तेंव्हा कुंडली माध्यमातून फ़लीत वर्तवणारे शास्त्र मला अपेक्षीत आहे. वास्तू, डाउझींग, हस्तसामुद्रीक इ. बाबत नाही.

असे असताना यु.जी.सी अंतर्गत महाविद्यालये मात्र ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवण्यास तयार नाहीत किंवा कालीदास युनिव्हर्सिटी असा अभ्यासक्रम शिकवत असताना तो समकक्ष म्हणुन त्याला मान्यता नाही. यामुळे यावर संशोधनपर प्रबंध लिहीण्यास अडचणी आहेत. इंटर डिसीप्लीनरी अश्या अंतर्गत सुध्दा याला मर्यादा येत आहेत.

ज्योतिषशास्त्र अभ्यासकांमधे असे काही उत्तम अभ्यासक आहेत ज्यांनी आपली आयुष्ये खर्ची घालून जे काय संशोधन आजवर केले आहे ते त्यांच्या पर्यंतच राहील आणि अभ्यास म्हणुन पुढे येणार नाही अशी अवस्था झाली आहे. भारतीय जनतेला याचा उपयोग होणार नाही.

जन्माला आल्या आल्या या जातकाला डायबेटीस होईल की नाही हे वर्तवण्याचे तंत्र ज्योतिषभास्कर सुरेंद्र पै यांनी कुंडलीच्या अभ्यासाने विकसीत केले आहे. १९८९ साली प्रसिध्द झालेल्या मेडीकल अ‍ॅस्टोलॉजीवर आधारीत कुंडलीद्वारे रोगनिदान या पुस्ताकात या तंत्राचा आणि अनेक रोगांचा उल्लेख आहे. डायबेटीस हा नजीकच्या काळात भारतात वाढणार असल्याचे तज्ञ म्हणतात. कुणालाही जर कुंडली अभ्यासाने डायबेटिस होणार असे समजले तर ती व्यक्ती खुप आधीपासून आपली लाईफ़ स्टाईल बदलून या रोगापासून बचाव करेल असा उपयोग या शास्त्राचा आहे. परंतु ज्योतिषशास्त्र नाही असा प्रचार केल्यामुळे या पध्दतीच्या संशोधनाला सुध्दा युनिव्हर्सीटी मधे मान्यता मिळत नाही. असे झाले  तर हे शास्त्र फ़क्त भाग्य कधी उजाडेल ? लग्न कधी होईल इथपर्यंतच मर्यादीत राहील.

मी ज्योतिष शिकायला १९९२ साली सुरवात केली तेंव्हा स्वत: ला बुध्दीजीवी समजणारे लोक  ज्योतिष हे शास्त्र नाही असा प्रचार करत होते.. माझ्या मते आज हा प्रचार संपला आहे. घुसमट नाही परंतु प्रोत्साहन सुध्दा नाही अशी काहीशी अवस्था आहे. भारतातील सर्वांनी किमान ज्यांना शिक्षण, शैक्षणीक अभ्यास, संशोधन, त्याला मिळणारी मान्यता याची महती समजते त्यांनी हा ज्योतिषशास्त्र हा विषय युनिव्हर्सीटी अभ्यासक्रमात असावा असा आग्रह धरला पाहिजे.

हे सर्व बदलावे, यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) या संस्थेने मान्यता दिलेल्या युनिव्हर्सिटी मधून ज्योतिषशास्त्र शिकवले जावे असे मला वाटते. हे सर्व घडणार कसे या साठी सध्याचे एच आर डी मिनीस्टर माननीय प्रकाश जावडेकर साहेब, जे सर्व युनिव्हर्सीटी संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतात तसेच यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) च्या मुख्य अधिकार्यांना एक पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

मी खाली मसूदा देत आहे. आपण त्याला मान्यता देऊन यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) मान्यताप्राप्त युनिव्हर्सीटी मधे ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक्रम सुरु व्हावा यासाठी आपले आग्रहपुर्वक मत द्यावे ही विनंती.

मा. प्रकाशजी जावडेकरसाहेब, केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्री
भारत सरकार

महोदय,

नक्षत्रप्रकाश चे सदस्य असलेले सर्व सभासद आणि ज्योतिषप्रेमी आपणास नम्र निवेदन करतो की माननीय सुप्रिम कोर्टाने २००४ मधे ज्योतिष हे शास्त्र आहे असा निर्वाळा देऊन आता १४ वर्षे झाली. अद्याप युजीसी ने हा विषय युनिवर्सिटी माध्यमातून शिकवण्यास मान्यता दिलेली नाही. आपणास विनंती आहे की या संदर्भातले अडथळे दुर करावेत.

आपले नम्र,

ज्योतिषप्रेमी, अभ्यासक
भारतीय नागरीक

आपणास विनंती आहे की आपण ह्या सोबत असलेल्या लिंक ला जोडलेल्या मतप्रदर्शनात आपले बहुमोल मत द्यावे. जेणे करुन हा पत्राचा मसुदा व मत संख्या यातून निर्माण होणार्या भावना माननीय मनुष्य़बळ मंत्री यांच्याकडे सुपुर्त करता येतील.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScpo8R6AAjZYLvqKMb5__oIxb2dBpVY7zSrd_2Gr7-BhET4kQ/viewform

No comments:

Post a Comment